Skip to main content

                      नरेंद्र मोदी- गुजरातच्या विजयाचे शिल्पकार 

                         लोकप्रियता, मानसन्मान मिळवणं हि फार कठीण गोष्ट आहे. आयुष्यभरचे कष्ट, जिद्द यांच्या जोरावरच उत्तरायुष्यात लोकप्रियता लाभते. शून्यातून पुढे येउन राजकारणातलं, प्रशासनातलं उच्च पद मिळवणं यासाठी बेसुमार कष्टांची, ध्येयाच्या मागे हात धुवून लागण्याची आवश्यकता असते. Excellence, Brilliance, Honesty, Ethics या चार गोष्टींच्या मागे धावणाऱ्या माणसाच्या मागे लोकप्रियता धावत असते. याचंच एक उदाहरण म्हणजे नरेंद्र मोदी. विकासपुरुष म्हणून ओळखले जाणारे मोदी पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार मानले जातात. गुजरात राज्याला प्रादेशिक अस्मितेची आणि सर्वांगीण विकासाची हाक देअन्रे आणि ती बर्यापैकी पूर्ण करणारे मोदी आज सलग तिसर्यांदा गुजरात विधानसभेची निवडणूक जिंकले.  
                     सुमारे वर्षभरापासून आरोप-प्रत्यारोप आणि प्रचाराच्या धूमधडाक्यामुळे चुरशीची बनलेली हि निवडणूक अखेर सलग ११ वर्षापासून सत्तेत असणार्या भाजपनेच जिंकली. वास्तविक भाजपने म्हणण्यापेक्षा मोदिनीच जिंकली असे म्हणणे संयुक्तिक ठरेल. कारण प्रचारादरम्यान भाजप च्या इतर राष्ट्रीय नेत्यांचा सहभाग अत्यंत   म्हणजे या ठिकाणी पक्षीय नाही तर व्यक्तिकेंद्रित लोकप्रियता विजयी झाली. आणि का न व्हावी?? १०% विकासदर असणारं, उत्तमोत्तम पायाभूत सुविधा, उत्तम-पारदर्शक प्रशासन देणारा नेता गुजरातच्या जनतेने मुख्यमंत्री म्हणून निवडून द्यावा हे साहजिकच म्हणावे लागेल. ११ वर्ष सत्ता असताना राज्याचा झालेला विकास वाखाणण्यासारखा आहे. रस्ते, वीज, पाणी या मुलभूत गरजांच्या जोडीला शिक्षण, रोजगार, उद्योगांसाठी पोषक वातावरण, पर्यटन, शेती, आरोग्य सुविधा, व्यापार वृद्धिसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर बंदरांचा विकास, म्हणजे एकंदर सर्वच बाबतीत विकास साधला गेलेला आहे.
                     भाजप, स्वतःला सामुहिक नेतृत्व आणि लोकशाही मार्गाने चालणारा पक्ष म्हणवून घेतो. कितीही नाही म्हटलं तरी हा पक्ष रास्व संघच्या रिमोट कंट्रोल वर चालतो. त्यामानाने गुजरातेत भाजपची हि प्रतिमा धुळीला मिळाल्यागत जमा आहे, कारण तिथे नरेंद्र मोडी नामक एककेंद्री नेतृत्व प्रस्थपित झाले आहे. हे भाजप च्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या वर्तुळात पचनी पडण्यासारखं नाही. म्हणजेच गुजरातेतील भाजप हे नरेंद्र मोडी यांचे स्वतंत्र संस्थान झालेले आहे. वेळीप्रसंगी मोडी राष्ट्रीय नेतृत्वाला गुंडाळण्यात मागेपुढे पाहत नाहीत, यामुळे संघही मोदींवर उखडलेला आहे.मध्यंतरी नितीन गडकरींवर भ्रष्टाचाराचे आरोप होत होते. त्यावेळी असाही लक्षात आलं होतं कि ह्या आरोपांची सुरवात, त्याचं मुल हे गुजरातेत आहे. वास्तविक मोदींचा विजय हि काळ्या दगडावरची रेघ होती. किती जागा कमावणार आणि किती जागा गमावणार हि फक्त पाहण्यासारखी बाब होती. बाकी काहीही असो यामुळे भाजप मधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत एवढ मात्र नक्की. 
                     गुजरातच्या निवडणुकीतही राहुल गांधीनी मोदींविरोधात बर्यापैकी दंड थोपटले होते. आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवली होती. पण त्यांची डाळ काही शिजली नाही. वास्तविक बिहार, उत्तर प्रदेशचा ताजं उदाहरण असताना राहुल गांधींकडून फारश्या अपेक्षा नव्हत्या, पण किमान भाजपच्या काही जागा कमी होतील अशी अपेक्षा होती. नाराज केशुभाई पटेलांचा नवा पक्षदेखील फार काही दिवे लावू शकला नाही. ज्या पटेल समाजाच्या पाठिंब्याच्या जोरावर त्यांनी नवा पक्ष उभारला तो पटेल समाजच मोदींच्या बाजूने उभा राहिला. या सगळ्या धामधूमीनंतरही (म्हणजे आधीच ) राहुल गांधींकडे पुढील निवडणूकींची माळ सोपवणे हे कॉंग्रेसच्या लाचार परंपरेला अनुसरूनच झाले. त्याला कोण काय करणार? याच लाचार्पानामुळे कि काय कुठल्याच राज्यात कॉंग्रेसला स्थानिक प्रभावी नेतृत्व देत आलं नाही. गुजरात, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश हे याचे ठळक उदाहरणं म्हणता येतील. आता परीस्थित बदलणं शक्य नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत काय दिवे लागतात हे पाहणं संयुक्तिक ठरेल. 
                   मोदिनी साधलेला हा सलग तिसरा विजय म्हणजे त्यांच्या राष्ट्रीय राजकारणातील प्रवेशाची नांदी आहे अशी चर्चा सर्वत्र झडते आहे. मोदीच पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार आहेत, अशी चर्चा प्रसारमाध्यम रंगवू लागलेली आहेत. पण ह्या प्रश्नावर भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी बाळगलेलं मौन बराच काही सांगून जातं. नरेंद्र मोडी हे एककल्ली आणि बर्याच प्रमाणात हुकुमशाहिप्रमाणे राज्य करतात असा प्रमुख आरोप त्यांच्यावर होतो. शिवाय याच कारणामुळे राष्ट्रीय कार्यकारिणी आणि संघ मोदींवर नाराज आहे. आता या ११ वर्षांच्या काळात गुजरात भाजप मध्ये झालेला आणखी एक लक्षणीय बदल म्हणजे नेतृत्वाची दुसरी फळीच नाहीशी झालेली आहे. वास्तविक राजकीय पक्सःत आणि त्यातही भाजप सारख्या लोकशाही पक्षाची हि अवस्था घातक आहे. नरेंद्र मोदींनी उद्या राष्ट्रीय राक्कारणात उडी घेतलीच तर त्यांची जागा घेणारा नेता गुजरातेत दुसरा नाही. हे अत्यंत घातक आहे. व्यवस्थापन शास्त्रात 'Succession Planning' हे प्राथमिक तत्वांपैकी १ आहे पण या ठिकाणी हेच धाब्यावर बसवलेले आहे. स्वतःला CEO म्हणवून घेणाऱ्या नरेंद्र मोदींना हि साधी गोष्ट कळू नये हे दुर्दैवी म्हणायला हवे.
                         

Comments

Popular posts from this blog

डॉ. आंबेडकरांचे आर्थिक चिंतन आणि वर्तमानातील प्रासंगिकता

एक प्रसिद्ध वचन आहे, "some are born great, some achieve greatness and some are those the greatness is thrust on them.." म्हणजे, काही जन्मतःच महान असतात. तर काही आपल्या कार्यातून, कृतीतून महत्पदाला पोचतात. तर काहींवर महानता लादली, थोपली गेलेली असते. प्रस्तुत विषयाला अनुसरून या वचनातला तिसरा भाग अप्रस्तुत आहे. माणूस जन्मतःच महान असतो का? ती जन्मजात महानता त्या माणसाच्या पुढील आयुष्यातील महत्कार्यामुळे सिद्ध होते. थोर, साक्षेपी विचारवंत कुरुंदकर मांडतात त्याप्रमाणे शिवाजी महाराज हे जन्मतःच महान होते असे आपण म्हणतो कारण महाराजांचे संपूर्ण महत्कार्य आपल्या समोर आहे म्हणून. याच न्यायाने भारतीय सामाजिक, राजकीय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक क्षेत्रात आपल्या कृतीतून, कार्यातून महत्पदाला पोचलेले महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्या महामानवाचे महत्कार्य आपल्या समोर आहे, म्हणून आपण अभिमानाने म्हणून शकतो की ते जन्मताच महान होते.  भारतीय समाजमन माणसांना चौकटीत बसवण्यास उत्सुक असते. एकाच झापडबंद दृष्टीने व्यक्ती आणि कार्याकडे बघण्याचा प्रयत्न करते. पण याच भारताची दुसरी ...

मऱ्हाटीची बोलू कौतुके

छायाचित्र सौजन्य: इंटरनेट  अर्थाचा अनर्थ केला की घोटाळे होतात. कसे?  एक्स (भूतपूर्व ट्विटर) वर 'जेम्स ऑफ बॉलिवूड' नावाचं एक हॅन्डल आहे. हिंदी सिनेसृष्टी, ज्याला बॉलिवूड असं म्हणतात, तिथे ४०-५० च्या काळापासून हिंदू तितुका वाईट, हिंदू चालीरीती तितुक्या वाईट, त्यांची कितीही खिल्ली उडवा पण एक प्रेमळ रहीम चाचा, माय सन वगैरे म्हणणारा पाद्री प्रेमळच असणार याची जंत्री मांडलेली असते. बहुतांश खरी असते. पण त्याच हँडलच्या निर्माते-चालक संजीव नेवर यांनी एका मुलाखतीत एका गोष्टीचा अर्थाचा अनर्थ केला आणि घोटाळा केला.  त्यांनी लता मंगेशकर यांच्या संदर्भातला एक दाखला दिला, की सुरुवातीच्या काळात दिलीप कुमार यांनी लता मंगेशकर यांना उद्देशून एक टोमणावजा वक्तव्य केले की, तुमच्या उर्दूच्या उच्चारात मराठीपणा दिसतो. तर लता मंगेशकर यांनी दीड वर्षे उर्दूची शिकवणी लावून आपले उर्दू उच्चार घोटून घेतले. इतके की कोणाला शंकाही येऊ नये.  त्यावर या नेवर यांचं म्हणणं असं की लता मंगेशकर यांना उर्दू वगैरे शिकण्याची काय गरज होती? आणि त्यांनी ठणकावून सांगण्याची गरज होती की, 'हो, आहे मी मराठी. मग माझ्या उच्...

Mestak: Decolonizing Bharat the Maratha Way

Hemadri Pandit. Decolonisation is not merely the removal of foreign political power. It is the restoration of intellectual confidence. It is the recovery of systems. It is the reclaiming of institutional memory. The Maratha Empire did not simply challenge imperial authority on the battlefield; it reconstructed the civilizational backbone of Bharat. At the heart of that reconstruction lay something deeply profound yet often overlooked: the revival of the ancient Indic tradition of accounting and state book-keeping embodied in the concept of मेस्तक (Mestak). What is Mestak? Mestak was a structured accounting manuscript tradition, a codified format for recording state revenue and expenditure. But more than that, it was a philosophy of governance. The preserved shloka states: लेखकासी हे मेस्तक। नीतिवंता नीतिशास्त्र देखा। राजकी लोकांसि विवेक। प्रकट करी।। लेखणी दिधली ज्याचे हाती। तो स्वीकारिला सरस्वती। लेखनकळा वर्षा आरती। साधली तया I आताही जे असता धरिती येणेप्रमाणे लिहिती। त्यासी पावेल सरस्व...