Skip to main content

Posts

Showing posts with the label Cinema

Shivraj Ashtak: Digpal Lanjekar

A Perfect Blend of  Adhering to Historical Facts and Creative Liberty  Chhatrapati Shivaji Maharaj is a scared, revered figure for the Maharashtrians, Indians. He is not any other king who found his kingdom by defecting a weak existing king. He is revered because his ideals, his actions, his vision changed the course of history. India, especially Hindus in India owe their existence today to Shivaji Maharaj. Maharaj always iterated that establishment of Hindavi Swarajya is will of Shri (Ishwar), I am the marshal of that will. Many historians have written biographies, historical accounts on Maharaj. Some of the most authentic historians are Gajanan Bhaskar Mehendale, Va. Si. Bendre, Jadunath Sarkar, Vi. Ka. Rajwade, T. S. Shejwalkar and many more. There are great scholars like Narhar Kurundkar who have put brilliant analysis on life and times of Shivaji Maharaj at various platforms. I would like to quote what Narhar Kurundkar has stated about Maharaj, and will go to the topic,...

अखेरचा हा तुला दंडवत

स्वराज्य तोरण चढे, गर्जती तोफांचे चौघडे, मराठी पाऊल पडते पुढे.. शांता शेळकेंच्या शब्दांना स्वरसाज चढवणारी व्यक्ती ही त्यातल्या 'मराठी पाऊल पडते पुढे' चे मूर्तिमंत उदाहरण. यात काहीही अतिशयोक्ती ठरणार नाही. आठ दशकांहून अधिक काळ हिंदी, मराठी सोबत भारतातील जवळ जवळ सर्व भाषांतील हजारांच्या घरातील गाणी, मराठी चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन, अशी त्यांची देदीप्यमान कारकीर्द. ते मराठी पाऊल अवघे जग व्यापून दशांगुळे उरले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. ते आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे लता मंगेशकर. सर्वांच्या लाडक्या लता दीदी. त्यांच्या अचाट, अफाट कामगिरीचा यथोचित गौरव झाला. भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न, चित्रपट जगतातील सर्वोच्च दादासाहेब फाळके सन्मान आणि अगणित सन्मान त्यांना मिळाले. कित्येक पिढ्या लहानाच्या मोठ्या झाल्या. पण प्रत्येक पिढीला त्या 'आपल्या' वाटत आलेल्या आहेत. हे आपलेपण, हा जिव्हाळा, हे प्रेम, एखाद्याच्याच वाट्याला येते. ते आयुष्याचे संचित गाठण्यासाठी कुठली तपश्चर्या करावी लागत नाही. आपण निवडलेले क्षेत्र, त्यातली उत्तमता, उत्कृष्टता हीच तपश्चर्या होते.  मुली औक्...

१९१७: उलटणारा वेळ हाच कसा वैरी होतो याची कथा

१९१७ महायुद्धाची भीषणता आणि उलटणारा  वेळ हाच कसा वैरी होतो याची कथा              दोन महायुद्ध. जगाच्या राजकारणाचे, समाजकारणाचे, अर्थकारणाचे पाट बदलणारे. पहिल्या महायुद्धाची कारणे शोधू तितकी कमी इतकी त्यात गुंतागुंत आहे. त्याच्या कारणांचा  वेध घेत गेलो तर युरोपच्या राजकारणात किमान १०० वर्षे मागे जावे लागते. जर्मनी, इटलीचे एकीकरण, वसाहतवादी स्पर्धा, बिस्मार्कचे राजकारण, महत्वाकांक्षा यातली प्रचंड गुंतागुंत ते सर्बियाचा राजपुत्र फ्रान्झ फर्डिनांडची हत्या हे तात्कालिक कारण असा मोठा पट त्यात आहे. जितका मोठा पट युद्धामागील कारणांचा आहे तितकाच मोठा पट प्रत्यक्ष युद्धाचा आहे. किंबहुना खूप कमी कालमर्यादेत प्रचंड उलथापालथ महायुद्ध काळात झाली आहे. पहिल्या महायुद्धा मागील कारणांची पार्श्वभूमी मोठी असली तरी दुसऱ्या महायुद्धामागे इतर कशाहीपेक्षा पहिले महायुद्ध हेच एक मोठे कारण होते. जगाचे पाट बदलणाऱ्या या घटनाक्रमांनी हॉलीवूडला अचाट, सुंदर युद्धपट करण्यासाठी हजारोंच्या संख्येत विषय आयते तयार करून ठेवले आहेत. त्यात चार्ली चॅप्...

Panipat: The Great Betrayal

पानिपत  इ. स. १५२६, १५५६ आणि १७६१ हि वर्ष मध्ययुगीन भारताचा इतिहास मुळातूनच बदलण्यास कारणीभूत ठरली. इतिहासाचे सर्व संदर्भ, इतिहासाची गणितंच बदलली या वर्षी. समरकंदचा निर्वासित सुलतान बाबर इब्राहीम लोदीचा पराभव करून मोंगल राजवंशाची स्थापना १५२६ या वर्षी करतो. मोंगल वंशाचा निर्वासित वंशज अकबर, बैराम खानच्या मदतीनं हेमूचा पराभव करून मोंगल राज्याची पुनर्स्थापना १५५६ या वर्षी करतो. हिंदुस्थानच्या रक्षणार्थ लाखभर मराठी लष्कर परकीय घुसखोर अहमदशहा अब्दालीविरुद्ध १७६१ साली जीवघेणा लढा देतात. या तिन्ही इतिहास बदलणाऱ्या लढाया झाल्या त्या पानिपतच्या परिसरात. पानिपतच्या त्या भूमीचं महत्व काही ओउरच आहे. दोन राजघराण्यांची स्थापना आणि ते राज्य वाचवण्यासाठी घनघोर लढाया झाल्या त्या याच भूमीवर. Alexander पासून अब्दालीपर्यंत हिंदुस्थानवर आक्रमणं व्हायची ती खैबरखिंड, पानिपत याच मार्गानं. अफगाणीस्तनातून, पंजाब मार्गे दिल्लीकडे सरकणारा हा मार्ग अनादिकालापासून  रुधिरासाठी चटावलेला आहे. महाभारतातल महायुद्ध घडलेली ती कुरुक्षेत्राची भूमी तिथून जवळच आहे. पानिपतच तिसरा युद्ध अफगाण घुसखोर अहमद...

फर्जंद ते फत्तेशिकस्त

फर्जंद ते फत्तेशिकस्त  शिवाजी, भारताच्या इतिहासातील युगप्रवर्तक राजा. यादव, विजयनगर या साम्राज्यांच्या पाडावानंतर एक अहोम राज्य वगळता सर्वत्र मुसलमानी राजवट कायम झाली होती. एतद्देशीय मराठा, राजपूत आणि इतर सर्व सरदार घराणी तालेवार होती, मातब्बर होती पण त्यांच्या आपापसात लढाया होत असत. एकमेकांच्या लग्नाच्या वऱ्हाडांवर हल्ले केले जात असत. एकमेकांत वैर असले तरी चाकरी मात्र इमाने इतबारे बादशहाची करत असत. या सर्वात स्वातंत्र्याकांक्षी एक घराणे आले ज्यांनी इतिहासाचे पाट बदलले. शहाजी राजांनी स्वराज्याच्या अयशस्वी प्रयत्न केला. पण पुढे जात बंगळुरू, तंजावर येथे जवळ जवळ स्वायत्त असे राज्य उभारले. इकडे महाराष्ट्रात मात्र शिवाजी राजांनी मावळातल्या सामान्य माणसांना एकत्र करत, त्यांच्यातून नवे सरदार घडवत एक स्वराज्य स्थापन केले. ते स्वराज्य रयतेचे राज्य होते. ते स्वराज्य व्हावे ही 'श्रीं'ची इच्छा या भावनेतून उभारणी झाली होती. या स्वराज्यस्थापनेचा अचाट पराक्रम पाहून गागाभट्टांसारख्या प्रकांड पंडिताने राज्याभिषेकाची कल्पना मांडली आणि ती तडीस नेली. त्यासाठी एक नवा ग्रंथ शिवराज्याभिषे...

जोकर

जोकर अस्वस्थ करणारा सिनेमा   माझ्याशिवाय तुझ्या अस्तित्वाला काही अर्थ नाही. मी आहे म्हणून तुझे महत्व आहे... ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित 'द डार्क नाईट राईसेज' चित्रपटातील जोकर हे खलनायकी पात्र नायक, सुपरहिरो बॅटमॅन ला म्हणतो. हे खरेच आहे. चित्रपट असो कि सामान्य जीवन खलनायकाच्या खलत्वावर नायकाचे नायकत्व अवलंबून असते. चित्रपट, कथा, कादंबऱ्यांत आपल्या समोर उभा केला जातो तो नायक. त्याची बाजू. त्याची नायक होण्याकडची वाटचाल. पण त्यातील खलनायकाची देखील एक बाजू असते. त्याची देखील काही कहाणी असते. ती विचारात घेणे आवश्यक वाटू लागते. त्या खलनायकाच्या नकारात्मक बाजूचे उदात्तीकरण योग्य नाहीच. पण बाजू समजून घेणे आवश्यक आहे. जगभरच्या चित्रपटांमध्ये अनेक वेळा अँटी हिरो ह्या संकल्पनेवर आधारित चित्रपट तयार झाले आहेत. त्यात अमेरिकेतील माफिया जगतावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट गॉडफादरचा उल्लेख अपरिहार्य आहे. भारतीय चित्रपट परिप्रेक्ष्यात देखील अनेक अँटी हिरो संकल्पनेवर अनेक चित्रपट तयार झाले आहेत. रोमान्स चा बादशहा म्हणवला जाणारा शाहरुख खान पुढे आला तो अँटी हिरो टाईपच्या भूमिकांमधूनच. ही झाल...

अमिताभ..

अमिताभ .. अभिनय असावा तर त्याच्यासारखा, सभा - संमेलनात वावर असावा तर त्याच्यासारखा, भाषेवर प्रभुत्व असावं तर त्यांच्यासारखं, व्यावसायिकता असावी तर त्यांच्यासारखी, वय सहसरचंद्र दर्शनाकडे जात असताना तरुणांना लाजावणारी ऊर्जा असावी तर त्यांच्यासारखी, वागण्या - बोलण्यात सुसंस्कृतपणा असावा तर त्याच्यासारखा. आणखी किती आणि काय गुण सांगावेत त्यांच्यातले जे अंगीकारले तर माणूस आपापल्या क्षेत्रात यशस्वी होईल, मानद होईल. भारतीय चित्रपटसृष्टीत ४० वर्षांपेक्षा जास्त काळ विविध धाटणीचे चित्रपट, जाहिरात, दूरचित्रवाणी कार्यक्रम अशा क्षेत्रांत उत्तुंग काम केलेल्या, महनीय अशा महानायकला यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. गोवा मुक्तिंग्राम ही पार्श्वभूमी असणाऱ्या सात हिंदुस्तानी या चित्रपटातील अन्वर पासून ते अलीकडेच गाजलेल्या पिंक पर्यंत आपल्या अभिनयाने, भरदार आवाजाने महानायक झालेल्या अमिताभ बच्चन यांच्याविषयी अनेक माध्यमात अनेक वेळा बोललं गेलं आहे. त्यांच्या कारकीर्दीचा उहापोह अनेक वेळा करण्यात आलेला आहे. आता पुन्हा करण्यात काय हशील असा प्रश्न पडू शकतो. पण कितीही वेळा चर्चा केली तरी क...

सेक्शन 375 : मर्जी या जबरदस्ती

सेक्शन 375 : मर्जी या जबरदस्ती   ‘जस्टिस इज अ‍ॅबस्ट्रॅक्ट बट द लॉ इज फॅक्ट’ असा विचार करण्यास भाग पाडणार्‍या संवादाने चित्रपटाची सुरुवात होते. हा संवाद पुढे येतो तो मुंबईतील नामांकित वकील तरुण सलुजा (अक्षय खन्ना) एका विधी महाविद्यालयात व्याख्यान देत असताना चित्रपटाच्या साधारण सुरुवातीलाच असा प्रश्नार्थक संवाद देऊन, चित्रपट मूळ कथानकाकडे वळतो. या चित्रपटाची कथा भारतीय दंडविधानाच्या कलम 375 आणि 376 च्या भोवती गुंफलेली आहे. पार्श्वभूमी आहे ती नुकत्याच झालेल्या ‘मि टू’ चळवळीची. हिंदी चित्रपटसृष्टीतील नामांकित दिग्दर्शक रोहन खुराणा (राहुल भट) आपल्या घरी आलेल्या कॉस्चूम विभागात काम करणार्‍या मुलीवर बलात्कार करतो. मुलगी पोलीसात तक्रार दाखल करते. दिग्दर्शकाला अटक होते. हिंदी चित्रपटसृष्टी असल्यामुळे प्रकरण माध्यमांमध्ये खूप चर्चेत येते. मीडिया, सोशल मीडियाच्या न्यायालयात दिग्दर्शकाला दोषी करार दिला जातो. सोशल मीडियावर हँग द रेपिस्ट वगैरे हॅशटॅग फिरतो. स्थानिक सत्र न्यायालयात दाखल झालेली तक्रार, वैद्यकीय चाचणी आणि प्राथमिक तपासणीनंतर मिळालेले पुरावे यांच्या आधारावर 10 वर्षे...

मिशन मंगल: मंगळयान मोहिमेची रंजक सफर

    भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थातच इसरो पन्नासाव्या वर्षात आहे. केरळातील कालडी च्या प्रदेशात तुटपुंज्या निधीच्या आधाराने भारतीय अवकाश संशोधन मोहिमेचा प्रारंभ झाला. सुरुवात पेन्सिलीच्या आकाराच्या हवामान अभ्यास करणाऱ्या रॉकेटपासून झाली. त्यानंतर रॉकेटचा आकार, त्या रॉकेटचे उद्देश मोठे होत गेले. पहिले मोठे रॉकेट भारतीय शास्त्रज्ञांनी सायकलवरून, पहिला उपग्रह बैलगाडीतून योग्य त्या स्थळी पोचवला आहे. भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाचे पितामह डॉ. विक्रम साराभाई आणि इतर शास्त्रज्ञांनी १९६९ साली सुरू केलेल्या रोपाचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. १९६९ साली सुरुवात केल्यांनतर पहिला दूरसंचार उपग्रह 'आर्यभट्ट' १९७५ मध्ये सोडण्यात आला. त्या पुढला उपग्रह 'रोहिणी' १९७९ मध्ये सोडण्यात आला. पेन्सिलीच्या आकाराचे रॉकेट ते संपूर्ण उपग्रह हा पहिला पल्ला अवघ्या ६ वर्षात गाठला गेला. भारताची तोळामासा आर्थिक स्थिती हे एकमेव कारण भारताच्या 'लो बजेट' अवकाश कार्यक्रमामागे नव्हते. त्याला शीतयुद्ध, भारताची अलिप्ततावादी परराष्ट्र नीती आणि १९७१ पासून पुढे उघडपणे रशियाकडे झुकलेले धोरण यामु...

सिनेमा आणि सॉफ्ट पॉवर

  लष्करी बळ, सिनेमा आणि निर्माण होणारा दबदबा      ए क निर्विवाद सत्य पहिल्या प्रथम मान्य करायलाच हवे ते म्हणजे सिनेमा म्हणजे सिनेमा, चित्रपट ही आजच्या काळातली लोककला आहे. अमिताभ बच्चनचा अँग्री यांग मॅन जितका महाराष्ट्रात गाजतो तितकाच दक्षिण भारतात, पूर्वोत्तर भारतात गाजतो. या चित्रपटकलेत तांत्रिक अंगासोबतच संगीत, नृत्य, नाट्य, शिल्प, चित्र अशा सर्व कलांचा समावेश होतो. चित्रपटाच्या कथानकांनुसार स्थानिक, पारंपरिक लौकिकार्थाने ज्याला लोककला म्हणता येतील अशांचा देखील अंतर्भाव होतो. ५०-६० चे दशक भारतीय चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ मानला जातो. त्या काळात अप्रतिम संगीताची मेजवानी असणाऱ्या प्रेमकथांपासून सामाजिक विषयावरील असामान्य चित्रपट निर्माण झाले. वास्तववादाची अवास्तव जाहिरात न करताही रूढार्थाने ज्याला व्यावसायिक म्हणता येईल असे सिनेमे निर्माण झाले. वास्तविक याची सुरुवात प्रभातच्या माणूस, कुंकू, शेजारी पासूनच झाली आहे. प्रभातच्या संत तुकारामने तर ३०-४० च्या दशकात जागतिक पातळीवर वाहवा मिळवली. पुढे 'सर पर लाल टोपी रुसी' म्हणणाऱ्या राज कपूरची लोकप्रियता सोव्हिएत काळात ...
इट टेक्स करेज टू मेक राईट.. राईट  अ फ्यु गुड मेन ते शौर्य..  इट टेक्स करेज टू मेक राईट.. राईट! अशी टॅगलाईन असणारा शौर्य हा चित्रपट २००८ मध्ये येऊन गेला. हा चित्रपट आताच आठवण्याचे कारण केंद्र सरकारचा कलम ३७० अधिक कमकुवत, जवळ जवळ रद्द करण्याचा धाडसी, महत्वपूर्ण निर्णय  हे आहे. राज्यतघटनेतले ३७० हे कलम आणि त्यानुषंगाने आलेले ३५अ हे कलम यावर प्रचंड चर्चा, विवाद, न्यायालयीन खटले आजवर झाले आहेत. राज्यघटनेतील तरतूद, त्याचे बरेवाईट परिणाम यावर खूप चर्चा झाली आहे. ते कलम जम्मू आणि काश्मीर आणि लडाख पूर्णपणे भारतीय गणराज्यात सामील होण्यातला कसा अडथळा आहे यावर विद्यमान सत्ताधारी पक्ष, त्या पक्षाची मूळ विचारधारा आणि पालक संघटना म्हणजेच संघ ठाम होते आणि आहे. केंद्र सरकारच्या धाडसी निर्णयानंतर देशभर आनंदाचे, कौतुकाचे वातावरण आहे. इथवर सगळं ठीक आहे. पण मग शौर्य हा सिनेमा आणि त्याप्ररकारचे इतर सिनेमे यांचे प्रयोजन काय? १४ जानेवारी १९८९ हा दिवस काश्मीर खोऱ्यातील हिंदू, जे काश्मिरी पंडित या नावाने ओळखले जातात त्यांच्यासाठी काळा दिवस ठरला. खोऱ्यातील मशिदींमधून हिंदूंना काश्मीर त्...
आर्टिकल १५ 'ह म जितनी औकात देते है, उतनी ही उनकी औकात है!'  यात हम देते है म्हणजे कोण? आणि हे 'उनकी' म्हणजे कोणाची? इथे 'औकात' देणारे म्हणजे अर्थातच तथाकथित उच्चवर्णीय, उच्च जातीचे लोक. जन्माबरोबर केवळ जात मिळते. त्या जातीसोबत येणारं जळजळीत वास्तव मिळतं. दोन्ही बाजुंनी. तथाकथित उच्च वर्णीय देखील अनेक राज्यात सध्या मागास होण्याची किंवा निदान स्वतःला घोषित करून घेण्याची धडपड करत आहेत. आरक्षण ही संधी होती आणि आहे. वर्षानुवर्षे ज्यांना माणूस म्हणून जगण्यासाठी ज्या सुविधा, संधी नाकारल्या जात होत्या, त्या नकाराचा आधार जन्माबरोबर चिकटणारी जात, त्यांना उपलब्ध करून दिलेली संधी म्हणजे आरक्षण. हे आरक्षण हे साधन आहे पण जेव्हा तेच 'साध्य' बनायला लागलं तेव्हा मुळातच नसलेली सामाजिक एकता अधिकच बिथरली. वरवर दिसणारे पदर, होणाऱ्या चर्चा खूपच उथळ असतात. बहुतांश वेळा स्वतःच्या संरक्षित कोशात राहून होणाऱ्या चर्चा वाऱ्यानिशी उडून जातात. पण समाजातलं जात आणि त्याभोवती गुंफली गेलेली समाजव्यवस्था हे भयंकर भीषण वास्तव आहे. हे भीषण वास्तव ग्रामीण भागात अधिक टोकदार आहे. आजवर उत...