Skip to main content

१९१७: उलटणारा वेळ हाच कसा वैरी होतो याची कथा

१९१७
महायुद्धाची भीषणता आणि उलटणारा 
वेळ हाच कसा वैरी होतो याची कथा 









            दोन महायुद्ध. जगाच्या राजकारणाचे, समाजकारणाचे, अर्थकारणाचे पाट बदलणारे. पहिल्या महायुद्धाची कारणे शोधू तितकी कमी इतकी त्यात गुंतागुंत आहे. त्याच्या कारणांचा  वेध घेत गेलो तर युरोपच्या राजकारणात किमान १०० वर्षे मागे जावे लागते. जर्मनी, इटलीचे एकीकरण, वसाहतवादी स्पर्धा, बिस्मार्कचे राजकारण, महत्वाकांक्षा यातली प्रचंड गुंतागुंत ते सर्बियाचा राजपुत्र फ्रान्झ फर्डिनांडची हत्या हे तात्कालिक कारण असा मोठा पट त्यात आहे. जितका मोठा पट युद्धामागील कारणांचा आहे तितकाच मोठा पट प्रत्यक्ष युद्धाचा आहे. किंबहुना खूप कमी कालमर्यादेत प्रचंड उलथापालथ महायुद्ध काळात झाली आहे. पहिल्या महायुद्धा मागील कारणांची पार्श्वभूमी मोठी असली तरी दुसऱ्या महायुद्धामागे इतर कशाहीपेक्षा पहिले महायुद्ध हेच एक मोठे कारण होते. जगाचे पाट बदलणाऱ्या या घटनाक्रमांनी हॉलीवूडला अचाट, सुंदर युद्धपट करण्यासाठी हजारोंच्या संख्येत विषय आयते तयार करून ठेवले आहेत. त्यात चार्ली चॅप्लिनच्या 'द डिक्टेटर' पासून ते ताज्या १९१७ पर्यंत नितांत सुंदर आणि युद्धपट किंवा एकूणच चित्रपट क्षेत्रातले मैलाचे दगड ठरतील असे चित्रपट निर्माण झाले आहेत. त्यातल्या काही चित्रपटांनी थेट ऑस्कर पर्यंत धडक दिली. ताजा '१९१७' देखील यंदाच्या ऑस्करच्या शर्यतीत आहे. 

           पहिले महायुद्ध. युरोपीय सत्ता एकमेकांविरुद्ध ठाकल्या. सुरुवातीला कैसरच्या जर्मनीची सरशी झाली. पण अमेरिकेच्या हस्तक्षेपानंतर युद्धाचा रंग पालटला. जर्मन सैन्याने माघार घेण्यास सुरुवात केली. माघार घेत असतानाही ठिकठिकाणी शत्रू सैन्यासाठी सापळे रचून ठेवले होते. अशाच एका युद्धभूमीवर जर्मन सैन्याने माघार घेतली आहे. तेव्हा जर्मन सैन्याला अधिक मागे रेटण्याचा उद्देशाने कर्नल मॅकेंझीच्या नेतृत्वाखालील तुकडी दुसऱ्या दिवशी सकाळी हल्ला करणार आहे. पण या युद्धभूमीपासून काही  अंतर अलीकडे असलेल्या जनरल हुद्द्याच्या अधिकाऱ्याला जर्मन सैन्याची माघार हा एक सापळा आहे हे लक्षात येते. मॅकेंझीच्या तुकडीने हल्ला केला तर ती तुकडी आयतीच सापळ्यात अडकणार आहे आणि हकनाक अनेक जीव जाणार आहेत. तेव्हा जनरल हुद्द्याचा अधिकारी दोन धाडसी कॉर्पोरल हुद्द्याच्या जवानांना उद्या होणारा हल्ला थांबवण्याची आज्ञा घेऊन कर्नल मॅकेंझी पर्यंत पोचवण्याचा कामगिरीवर पाठवतात. युद्धभूमी, पहारे, गस्ती, युद्धासाठीचे चर, खंदक इत्यादी सर्व पार करत त्यांना कर्नल मॅकेंझी पर्यंत पोचायचं आहे. वेळ मर्यादित आहे, सैनिकांच्या एका तुकडीच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. कर्नल मॅकेंझीच्या तुकडीत या दोघांपैकी एकाचा भाऊ आहे. '१९१७' या सिनेमाची कथा म्हणावी तर ती एवढीच आहे. पण ती पडद्यावर मांडत असताना युद्धाची भीषणता, मानवी स्वभावातली गुंतागुंत तपशीलवार घेतली आहे. त्या दोघांपैकी एक सैनिक टॉम, कामगिरीवर असताना कामी येतो. माणूस मेल्यानंतर मानवी त्वचेच्या रंगात होणारे बदल याचा ज्या तपशिलात जाऊन विचार केला आहे आणि मांडणी केली आहे त्याला खरोखर सलाम! मुळात कथेचा जीव लहान आहे पण त्याची उणीव पटकथेच्या तपशीलवार मांडणीत भरून काढण्यात आली आहे. 



             हा चित्रपट एक भव्य दिव्य अनुभव आहे. प्रसंगानुरूप येणारे मोजके पण प्रभावी संवाद अतिशय उत्कृष्ट आहेत. संवादांऐवजी दृश्यमानतेवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. युद्धाची भीषणता आणि उलटणारा वेळ कसा वैरी होतो याची कथा पडद्यावर मांडणारा हा चित्रपट आवर्जून पाहावा असाच आहे. सेव्हिंग प्रायव्हेट रायन, डंकर्क वगैरे चित्रपटांच्या मांडणीच्या जवळपास जाणारा अनुभव देणारा हा चित्रपट आहे. युद्धाचा अनुभव घेण्यासाठी एकदा पहावाच असा १९१७. 

Comments

Popular posts from this blog

अथातो बिंब जिज्ञासा

अथातो ब्रह्म जिज्ञासा, असे म्हणत ऋषीमुनींनी या विश्वाचे रहस्य जाणून घेण्यासाठी गहन चर्चा केल्या. त्याचे रूपांतर वेद-उपनिषद, पुराणे यात झाले. त्यासोबतच एक प्रगल्भ समाज उभा राहिला, त्यांच्या पूजा पद्धती, उपासना पद्धती विकसित होत गेल्या. त्या क्रमाने विकसित होत निसर्ग-नैसर्गिक शक्तींची पूजा, यज्ञाद्वारे आहुती देणे ते प्रतीक निर्माण ते प्रतिमा निर्मिती इथवर पोचल्या. श्रेष्ठ मूर्तिविज्ञान साधक, संशोधक डॉ. गोरक्षनाथ तथा गो. ब. देगलूरकर, मांडतात, "ऋग्वेदात श्री विष्णूच्या संबंधी सहा ऋचा आहेत, त्या एका अर्थी विष्णूच्या 'शाब्दिक प्रतिमाच' आहेत. या शाब्दिक प्रतिमेचे प्रत्यक्ष प्रतिमेत रुपांतर करण्यासाठी पाषाण वापरले गेले. ते मग एका कुंपणाने बंदिस्त केले गेले. त्याला 'नारायण वाटक' म्हणू लागले" मूर्ती घडवणे, त्यांचे उपासना, पूजा यातील वाढते महत्त्व, त्यांचे अर्थ हा विषय गहन आहे तरीही उद्बोधक आहे. हाच देगलूरकर यांचा ध्यास आहे. तो आजवर अनेक पुस्तकांमधून समोर आला आहेच, त्यात 'अथातो बिंब जिज्ञासा' या टागोर फेलोशिप साठी लिहिलेल्या थिसीसची भर पडली आहे. तोच थिसीस मूर्ती,...

बांगलादेश राजकीय अस्थिरता; भारताला संधी

तिरुपूर: कापड उद्योग: फोटो बिजनेस स्टॅडंर्ड  बटरफ्लाय इफेक्ट... ही संकल्पना आता सर्वत्र झाली आहे. म्हणजे हजारो मैलांवर एखादी घटना घडते किंवा घडत असते आणि तिचे चांगले-वाईट परिणाम जगाच्या दुसऱ्या टोकाला दिसून येऊ शकतात. तसेच काहीसे एकोणिसाव्या शतकात भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्राच्या बाबतीत घडले.  उत्तर अमेरिका हा कापसाचा मोठा उत्पादक होता. मँचेस्टर वगैरे मधील वस्त्रोद्योगा साठी कच्चा माल मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण. कच्चा माल मिळण्याचे स्रोत खात्रीशीर आणि भारतासह सर्व वसाहती या हक्काची बाजारपेठ म्हणून उपलब्ध होत्या. हा व्यापार ब्रिटिशांसाठी लाभदायक होता. भारताकडे येणारा मार्ग 'केप ऑफ गुड होप' ला वळसा घालून येणारा, लांबचाच असला तरी लाभदायक होता. अमेरिकेच्या दक्षिणेकडील राज्यात हे कापसाचे प्रचंड उत्पादन होते आणि आफ्रिकेतून नेलेले गुलाम तिथे राबत असत. अब्राहम लिंकनच्या काळात गुलामी असावी की असू नये या प्रमुख मुद्द्यावरुन उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील राज्यात गृहयुद्ध पेटले. या युद्धात लाखांच्या घरात मनुष्यहानी झालीच पण ब्रिटिशांना मिळणारा हक्काचा कापूस पुरवठा झपाट्याने कमी झाला.  अश...

सह अस्तित्वाचे प्रश्न:

सह अस्तित्वासाठी मुस्लिम समाजाकडून हिंदूंच्या अपेक्षा  भारत हा विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक प्रवाहांचा गोपाळकाला आहे. एक चावून चोथा झालेलं वाक्य वापरायचे तर अनेक धर्म, सांस्कृतिक परंपरा इथे गुण्यागोविंदाने राहतात. खरेच राहतात? राहत असल्या असत्या तर 'सह अस्तित्वाचे प्रश्न' आपल्याला विचारावे लागले असते का?  भारत प्राचीन काळापासून कायमच सांस्कृतिक अखंडता असणारे, विविध राज्यांत, राज्यपद्धतीत नांदणारे राष्ट्र राहिले आहे. भारतीय विचारात आसेतुहिमाचल राजकीय प्रभुत्वाची, सार्वभौमत्वाची चक्रवर्ती ही संकल्पना आहे. प्राचीन काळापासून भारताने अनेक आक्रमणे झेलली. त्यातली बहुतांश पचवली. आक्रमक भारतीय विचारात, संस्कृतीत एकरूप झाले, मिसळून गेले. आक्रमकांना पचवून, त्यांना आपलंसं करुन सह अस्तित्वाचा एक आदर्श उभा करणारी ही संस्कृती मध्ययुगीन कालखंडाच्या सुरुवातीला आलेल्या, एका धार्मिक आक्रमणाने इतकी कोलमडली कशी? इतकी कोलमडली की त्यामुळे सह अस्तित्वाचे प्रश्न निर्माण होऊ लागले. त्याचे एक कारण निश्चितच भारतीय वैचारिक जगतात आलेले एक औदासिन्य, आत्ममग्नता आणि वाढती सामाजिक विषमता हे आहेच. ते नाका...