Skip to main content

नमामि ब्रम्हपुत्र.

                      

             ब्रम्हपुत्र. मानससरोवर ते बंगालचा उपसागर व्हाया गंगा नदी असा विविधतेनं नटलेला, लांबलचक प्रवास करणारा नद. तिबेटमध्ये त्सांगपो वगैरे नामाभिधान घेत 'द ग्रेट बेंड' ला अक्षरशः तोंड फिरवून अरुणाचल प्रदेशात प्रवेश घेतो. हिमालयातील अनेक प्रवाह आणि लोहित वगैरे नद्यांचा प्रवाह सामावून घेत आसामातल्या सादियाजवळ अक्राळविक्राळ रूप धारण करतो. मग मिडिया ते सध्या बांग्लादेशच्या सीमेजवळ असणाऱ्या धुबरीपर्यंत आसामची मैदानं गाळानं सुपीक, सुजलाम,सुफलाम करत जातो. त्याचबरोबर वर्षातून दोन वेळा अलोट पाण्याचा प्रवाह सामावत जिंव्हा पात्रात न सामावल्यामुळे आजूबाजूच्या प्रदेशात पसरत हाहाकार माजवून देतो. मालमत्ता, वित्त, आणि जीविताच्या हानीस कारणीभूत ठरतो. ह्या कारणामुळे 'आसामचे अश्रू' वगैरे विशेषणं झेलतो. ते काहीही असलं तरी 'मानवी जीवन,सांस्कृती, सभयता' नद्यांच्या खोऱ्यात वसतात, बहरतात, फळतात, फुलतात. नाशही पावतात. सत्यच आहे. भारताच्या सांस्कृतिक एकटेच भक्कम पुरावा असणाऱ्या महाभारतापासून अस्तित्वाच्या खुणा ब्रम्हपुत्रच्या खोऱ्यात आढळतात. प्राग्ज्योतिषपूर, कामरूप ते भारतातलं सर्वात जास्त काळ राज्य केलेलं घराणं 'ताई आहोम', त्यांचा पराक्रमी सेनापती लछित हा गौरवशाली इतिहास मिरवणारं, स्वातंत्र्यसेनानी आणि आसामला एकसंध भारतात राखण्यात सिंहाचा वाटा असणाऱ्या 'लोकप्रिय' गोपीनाथ बार्डोलाई यांचं  खोरं. श्रीमंत शंकरदेवांनी मुहूर्तमेढ रोवलेल्या वैष्णव संप्रदायाची पताका मिरवणारं खोर. बरोबर एक वर्ष २ ,अहिन्यापूर्वी ह्या प्रदेशात अभ्यास दौरा केला होता. त्याचे अनुभव जसे आठवतील, सुचतील, तसे शब्दबद्ध करतो आहे. ( आता हे आठवण्याचं कारण आसाम सरकारचा महत्वाकांक्षी 'नमामि ब्रम्हपुत्र' हा महोत्सव.)  त्यातीलच हा एक.. 
            त्रिपुरातला मैदानी, टेकड्यांचा प्रदेश त्यानंतर बराक नदीच्या खोऱ्याचा प्रदेश, दिमा हसओचा आदिवासी आणि अशांत प्रदेश पाहत, अनुभवत पुढल्या टप्प्यात आलो ते ब्रम्हपुत्रेच्या खोऱ्यात. जोरहाट. ब्रम्हपुत्राच्या खोऱ्यातलं जिल्ह्याचं ठिकाण. आसामचं मुख्य शैक्षणिक केंद्र, विशेषतः कृषी क्षेत्रातील शिक्षण, संशोधनाचं क्षेत्र. जगातलं सर्वात मोठं नदीतील बेट 'माजुली' चा प्रदेश आणि जिल्हा. ( आता माजुली बेट हा स्वतंत्र जिल्हा आहे. आसाम मध्ये सरकार बदललं आहे. नव्या मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ माजुली आहे. एकाच वर्षात सादिया {लवकरच वाहतुकीसाठी सुरु होणाऱ्या }, तेजपूर आणि गौहातीच्या पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे.) जोरहाट शहरापासून जवळच कमलबारी गाव, तिथून माजुलीकडे जाणाऱ्या बोट सेवा आहेत. ब्रम्हपुत्रमधला एकुणात दीड तासाचा प्रवास, तीथु शंकरदेवांच्या वैष्णव संप्रदायाच्या मंदिरांपर्यन्त, माजुलीतील अत्यंत हलक्या वजनाच्या लाकडी मुखवट्यांच्या कलाकेंद्रांपर्यंत, माजुलीतील विविध आदिवासी वस्त्या, पाण्याचे प्रवाह इत्यादींपर्यंत गाडीने प्रवास. रोजच्या वापरातल्या वस्तू ते इतर बाबतींसाठी ह्या बेटावरली जवळ जवळ २ लाख लोकसंख्या जोरहाट आणि उत्तरेकडल्या लखीमपूर वगैरेवर अवलंबून आहे. तेथील निसर्ग, जनजीवन पाहिलं, अनुभवलं. पण त्यापलीकडील जीवाला चटका लावणारा प्रसंग माजुलीला जात असतानाच कमलबारीला पहिला. जेट्टीच्या इथे एका बाजूला, एक महिला आकांत करत होती. आजूबाजूच्या परिस्थितीचा जणू तिला विसर पडला होता. तो आकांत अजूनही कानात घुमतो. अधिक चौकशी केली असता, कारण समजलं ते ऐकून कुठलीच प्रतिक्रिया येईना. विचार सुन्न पडले. त्या महिलेचा अवघा अडीच वर्षाचा मुलगा तिच्याच मांडीवर असताना हे जग सोडून गेला होता. जानेवारी महिन्यातली थंडी, त्या मुलाला असणारा कसलातरी आजार, त्या महिलेची आपल्या मुलाला आरोग्य सेवेपर्यन्त घेऊन जाण्यात असलेली आर्थिक असमर्थता आणि सरकारी काय किंवा खासगी काय आरोग्य सेवा पोचू न शकणं ह्यामुळे तो जीव गेला होता. 
                 विचार! विचार!! काही क्षण लाज वाटायला लागली. स्वतःची. कसली? इतक्या सुविधा मिळूनही आपण त्याची किंमत ठेवत नाही याची. सर्व सुखसोयी, सेवा हाताशी असूनही आपण सतत काहीतरी नसल्याचं रडगाणं गात राहतो याची. 'अभ्यास दौरा' त्यातून काय मिळतं? हेच सुन्न करणारे त्याचबरोबर काहीतरी करण्याचं बाळ आणि ईर्ष्या देणारे अनुभव मिळतात. प्रश्नच आवाका लक्षात यायला लागतो. सरकार, समाज, (खरोखर) समाजसेवा करणाऱ्या संस्था यांच्यासमोरचं आव्हान यांचा अंदाज यायला लागतो. माजुलीचा, आसाम राज्याचा अनुभव घेत संध्याकाळी भेट घेतली 'कार्यकर्ता अधिकारी' विशाल सोळंकी सरांची. जे त्यावेळी जोरहाटचे जिल्हाधिकारी ( आसाममध्ये उपायुक्त) होते. सध्या ते आसामच्या मुख्यमंत्र्यांचे सचिव आहेत. विविध प्रश्न त्यांची अत्यंत,  संयत आणि अभ्यासपूर्ण उत्तरं, हे सुरु असताना सकाळच्या 'त्या' अनुभवाच्या संदर्भात एक प्रश्न आमच्यातल्या एकीने विचारला. त्यावर सरांनी अत्यंत खेदपूर्वक नमूद केलं की ही परिस्थिती भरपूर ठिकाणी आहे. प्रामाणिक प्रयत्न आहेत पण त्याला निसर्ग, काही असामाजिक घटक यामुळे अडथळा येतो. पण सर्वात महत्वाची गोष्ट त्यानंतर सोळंकी सरांनी जोरहाटची सूत्र त्यांच्या जागी येणाऱ्या अधिकाऱ्याच्या हाती सोपवण्यापूर्वी आरोग्यसेवा सुधारली होती. ब्रम्हपुत्र आणि माजुलीला बोटीतील रुग्णवाहिका आणि प्राथमिक आरोग्य सेवा सुरु झाली होती आणि ती सुरळीत चालू लागलेली आहे. 
           जोरहाट-माजुलीचा संमिश्र अनुभव घेत, roll model असणाऱ्या लोकांना भेटत प्रवासाच्या पुढल्या टप्प्याला सुरुवात केली. पुढला टप्पा होता, हिमालय. तवांग !!!!

Comments

Popular posts from this blog

विश्वास कसा ठेवावा?

दिल्लीतील लाल किल्ला परिसरात स्फोट झाला, १२ जण ठार आणि २१ जखमी. ही बातमी ऐकताना आपण पुन्हा एकदा हादरलो. हा हादरा यावेळी अधिक खोल होता. कारण २०११–१२ नंतर जम्मू-कश्मीरच्या संवेदनशील पट्ट्याशिवाय भारतात मोठ्या साखळी स्फोटांची मालिका जवळजवळ थांबली होती. तुरळक घटना झाल्या, पण एकूणात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. “आमचा मुलगा निष्पाप आहे.” “सरकार खोटे आरोप करते.” ही सारवासारवी दरवेळी ऐकताना मनात प्रश्न पुन्हा उभा राहतो,  विश्वास कसा ठेवावा? मणिपूरमधील हल्ल्यानंतर म्यानमार सीमापार कारवाई झाली. उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक, पुलवामा नंतर बालाकोट, पहलगाव हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ चे तांडव झाले.  पण त्यांच्यापेक्षा कितीतरी पट अधिक महत्त्वाच्या, आणि क्वचितच चर्चेत येणाऱ्या, म्हणजे गुप्तचर संस्थांच्या  शंभरपैकी नव्व्याण्णव  यशस्वी कारवाया कटांचे उधळलेले धागे, पकडले गेलेले शस्त्रसाठे, रोखले गेलेले आत्मघातकी हल्ले, आणि वेळेवर अटकसत्रात अडकवलेले दहशतवादी.  २०१५–१६ मध्ये गुजरातच्या समुद्रात पकडून बुडवलेली संशयास्पद बोट असो, कांडला बंदरावर जप्त झालेले प्रचंड अंमली प...

मऱ्हाटीची बोलू कौतुके

छायाचित्र सौजन्य: इंटरनेट  अर्थाचा अनर्थ केला की घोटाळे होतात. कसे?  एक्स (भूतपूर्व ट्विटर) वर 'जेम्स ऑफ बॉलिवूड' नावाचं एक हॅन्डल आहे. हिंदी सिनेसृष्टी, ज्याला बॉलिवूड असं म्हणतात, तिथे ४०-५० च्या काळापासून हिंदू तितुका वाईट, हिंदू चालीरीती तितुक्या वाईट, त्यांची कितीही खिल्ली उडवा पण एक प्रेमळ रहीम चाचा, माय सन वगैरे म्हणणारा पाद्री प्रेमळच असणार याची जंत्री मांडलेली असते. बहुतांश खरी असते. पण त्याच हँडलच्या निर्माते-चालक संजीव नेवर यांनी एका मुलाखतीत एका गोष्टीचा अर्थाचा अनर्थ केला आणि घोटाळा केला.  त्यांनी लता मंगेशकर यांच्या संदर्भातला एक दाखला दिला, की सुरुवातीच्या काळात दिलीप कुमार यांनी लता मंगेशकर यांना उद्देशून एक टोमणावजा वक्तव्य केले की, तुमच्या उर्दूच्या उच्चारात मराठीपणा दिसतो. तर लता मंगेशकर यांनी दीड वर्षे उर्दूची शिकवणी लावून आपले उर्दू उच्चार घोटून घेतले. इतके की कोणाला शंकाही येऊ नये.  त्यावर या नेवर यांचं म्हणणं असं की लता मंगेशकर यांना उर्दू वगैरे शिकण्याची काय गरज होती? आणि त्यांनी ठणकावून सांगण्याची गरज होती की, 'हो, आहे मी मराठी. मग माझ्या उच्...

Mestak: Decolonizing Bharat the Maratha Way

Hemadri Pandit. Decolonisation is not merely the removal of foreign political power. It is the restoration of intellectual confidence. It is the recovery of systems. It is the reclaiming of institutional memory. The Maratha Empire did not simply challenge imperial authority on the battlefield; it reconstructed the civilizational backbone of Bharat. At the heart of that reconstruction lay something deeply profound yet often overlooked: the revival of the ancient Indic tradition of accounting and state book-keeping embodied in the concept of मेस्तक (Mestak). What is Mestak? Mestak was a structured accounting manuscript tradition, a codified format for recording state revenue and expenditure. But more than that, it was a philosophy of governance. The preserved shloka states: लेखकासी हे मेस्तक। नीतिवंता नीतिशास्त्र देखा। राजकी लोकांसि विवेक। प्रकट करी।। लेखणी दिधली ज्याचे हाती। तो स्वीकारिला सरस्वती। लेखनकळा वर्षा आरती। साधली तया I आताही जे असता धरिती येणेप्रमाणे लिहिती। त्यासी पावेल सरस्व...