Skip to main content

आम्ही काय करणार आहोत??



"साहेब उद्या मी एक प्रेस कॉन्फ़रन्स बोलावणार आहे. त्यात मी ह्या शहरातल्या 10 सर्वात मोठ्या स्मगलर्सची नावं जाहीर करणार आहे. त्याचबरोबर राजकारणातील त्यांच्या गॉडफादर्सची नावंही मी जाहीर करणार आहे.."
मुंबईतील मरीन ड्राइव भागातील एका चकचकीत इमारतीच्या गच्चीवर कम्युनिस्ट कामगार पुढारी डीकास्टा आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांमध्ये खासगी पण गुप्त संवाद सुरु आहे. डीकास्टाच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री म्हणतात,
   " हे सगळ बोलण खूप सोपं आहे डीकास्टा! अरे मनात आणलं तर आम्ही स्मगलिंग चोवीस तासात बंद करू. पण सध्या ते तितकसं महत्वाचं नाही. राज्यात इतर प्रश्न महत्वाचे आहेत. गरीबी आहे. कित्येक गावात अजून वीज नाही. महिलांना पाण्यासाठी मैलोनमैल भटकावं लागतं... मनात आलं की कसं गलबलायला होतं.. त्यांच्यासाठी आम्ही काय करणार आहोत रे???

   "स्मगलारांना संरक्षण देणार, असाच याचा अर्थ होतो, साहेब!"
डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित सिंहासन चित्रपटातील हा एक सूचक प्रसंग. एकाचवेळी दोन भिन्न विचारसरणीची माणसं, सत्ताकेंद्र काही वाक्यांमधून परिस्थिती मांडतात. प्रसंग 1970 च्या दशकातला असला तरी परिस्थितीत फारसा फरक नाही. काही तपशील बदलले आहेत. असं का? ही परिस्थिती का आहे? ह्यावर काहीच करता येणार नाही का? एक ना अनेक प्रश्न डोक्यात थैमान घालायला लागतात.
       कुठल्याही मोठ्या शहरातला वाहतूक दिवे असणारा मोठा चौक घ्या. रहदारी अखंड वाहत असते. दिवा लाल झाला की थांबते. अचानक त्या वाहनांच्या घोळक्यात हातात गुलाबांचे गुच्छ, खेळण्या घेउन विकायला येणारी लहान मुलं दिसतात. गाड्यांच्या काचा शक्यतो खाली येत नाहीत. दुचाकीस्वार बघून न बघितल्यासारखे करतात. चौकाच्या एखाद्या कोपऱ्यात त्या अभागी मुलांची आई वगैरे असते. मांडीवर एखादं तान्हं मूल असतं. त्या मुलांच्या हातातल्या वस्तू आपण विकत घेउ शकत नाही. कारण गरज नसते. मन कितीही संवेदनशील असलं तरी तर्कशुद्ध विचार करणारं मन 'गरज नाही..!!' हे स्पष्ट बजावतं.मनात प्रश्न पडतात यांचं भविष्य काय? यांच्या शिक्षणाचं काय? हे असं आयुष्य देण्यासाठी त्या अभागी माता इतक्या मुलांना जन्माला का घालतात? पण मग अर्थस्त्रातली कठोर सिद्धांत डोक्यात येतात. शिक्षण नाही. त्यामुळे समज कमी. 'जितकी जास्त मुलं तितके काम करणारे हात' ह्या न्यायाने 'शिक्षणाचा अभाव- समज कमी- अधिक मुले जन्माला घालणे- गरीबी- कुपोषण' हे अखंड चालणारं वर्तुळ चालूच राहतं. हे वर्तुळ कुठे, कोण आणि कधी भेदणार? मुख्य म्हणजे कोण भेदणार??
         हे एक प्रातिनिधिक उदाहरण झालं. ते पाहत असताना मुख्यमंत्र्याना पडणारे प्रश्न एक सामान्य माणूस म्हणून आपल्याला पडतात. काही लोक ती प्रश्न डोक्यात घेउन 'मला काय त्याचे (?)' ह्या भावनेने पुढे जातात. काही लोकांच्या डोक्यात ती प्रश्न कायम घोळत असतात. ती त्या प्रश्नांच्या मुळाशी जातात. त्याचा अभ्यास करतात. काही लोक त्या अभ्यासाच्या पलीकडे जात ती प्रश्न सोडवण्याच्या मागे लागतात. ह्या सगळ्यात आपण कुठे आहोत? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
         ह्या प्रश्नांचा अभ्यास करत असताना मोर्चा आपसूक आर्थिक आणि राजकीय विचारसरणीकड़े वळतो. भांडवलशाही, काही वेळा crony capitalism कड़े वळणारी भांडवलशाही की साम्यवाद-समाजवाद? वास्तविक सदरची मांडणी ही समाजवादाकडे झुकणारी असली तरी दूसरी बाजू कायम डोळ्यासमोर येते. खुलं उद्योगक्षेत्र, खासगी भांडवलाला मान्यता, उद्योजकता विकास यामुळे देशाची झपाटयाने आर्थिक प्रगती झाली. ही वस्तुस्थिती नाकरता येत नाही. त्यामुळेच पुन्हा आर्थिक वृद्धी की विकास हे द्वंद्व उभं ठाकतं. सगळ करून पुन्हा वैचारिक गोंधळात आणि प्रश्नांकडे मोर्चा येउन ठेपतो. आणि मुख्यमंत्र्यांसारखंच वाक्य उच्चारावंसं वाटतं,
" त्यांच्यासाठी आम्ही काय करणार आहोत....??"

      

Comments

Popular posts from this blog

अथातो बिंब जिज्ञासा

अथातो ब्रह्म जिज्ञासा, असे म्हणत ऋषीमुनींनी या विश्वाचे रहस्य जाणून घेण्यासाठी गहन चर्चा केल्या. त्याचे रूपांतर वेद-उपनिषद, पुराणे यात झाले. त्यासोबतच एक प्रगल्भ समाज उभा राहिला, त्यांच्या पूजा पद्धती, उपासना पद्धती विकसित होत गेल्या. त्या क्रमाने विकसित होत निसर्ग-नैसर्गिक शक्तींची पूजा, यज्ञाद्वारे आहुती देणे ते प्रतीक निर्माण ते प्रतिमा निर्मिती इथवर पोचल्या. श्रेष्ठ मूर्तिविज्ञान साधक, संशोधक डॉ. गोरक्षनाथ तथा गो. ब. देगलूरकर, मांडतात, "ऋग्वेदात श्री विष्णूच्या संबंधी सहा ऋचा आहेत, त्या एका अर्थी विष्णूच्या 'शाब्दिक प्रतिमाच' आहेत. या शाब्दिक प्रतिमेचे प्रत्यक्ष प्रतिमेत रुपांतर करण्यासाठी पाषाण वापरले गेले. ते मग एका कुंपणाने बंदिस्त केले गेले. त्याला 'नारायण वाटक' म्हणू लागले" मूर्ती घडवणे, त्यांचे उपासना, पूजा यातील वाढते महत्त्व, त्यांचे अर्थ हा विषय गहन आहे तरीही उद्बोधक आहे. हाच देगलूरकर यांचा ध्यास आहे. तो आजवर अनेक पुस्तकांमधून समोर आला आहेच, त्यात 'अथातो बिंब जिज्ञासा' या टागोर फेलोशिप साठी लिहिलेल्या थिसीसची भर पडली आहे. तोच थिसीस मूर्ती,...

बांगलादेश राजकीय अस्थिरता; भारताला संधी

तिरुपूर: कापड उद्योग: फोटो बिजनेस स्टॅडंर्ड  बटरफ्लाय इफेक्ट... ही संकल्पना आता सर्वत्र झाली आहे. म्हणजे हजारो मैलांवर एखादी घटना घडते किंवा घडत असते आणि तिचे चांगले-वाईट परिणाम जगाच्या दुसऱ्या टोकाला दिसून येऊ शकतात. तसेच काहीसे एकोणिसाव्या शतकात भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्राच्या बाबतीत घडले.  उत्तर अमेरिका हा कापसाचा मोठा उत्पादक होता. मँचेस्टर वगैरे मधील वस्त्रोद्योगा साठी कच्चा माल मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण. कच्चा माल मिळण्याचे स्रोत खात्रीशीर आणि भारतासह सर्व वसाहती या हक्काची बाजारपेठ म्हणून उपलब्ध होत्या. हा व्यापार ब्रिटिशांसाठी लाभदायक होता. भारताकडे येणारा मार्ग 'केप ऑफ गुड होप' ला वळसा घालून येणारा, लांबचाच असला तरी लाभदायक होता. अमेरिकेच्या दक्षिणेकडील राज्यात हे कापसाचे प्रचंड उत्पादन होते आणि आफ्रिकेतून नेलेले गुलाम तिथे राबत असत. अब्राहम लिंकनच्या काळात गुलामी असावी की असू नये या प्रमुख मुद्द्यावरुन उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील राज्यात गृहयुद्ध पेटले. या युद्धात लाखांच्या घरात मनुष्यहानी झालीच पण ब्रिटिशांना मिळणारा हक्काचा कापूस पुरवठा झपाट्याने कमी झाला.  अश...

सह अस्तित्वाचे प्रश्न:

सह अस्तित्वासाठी मुस्लिम समाजाकडून हिंदूंच्या अपेक्षा  भारत हा विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक प्रवाहांचा गोपाळकाला आहे. एक चावून चोथा झालेलं वाक्य वापरायचे तर अनेक धर्म, सांस्कृतिक परंपरा इथे गुण्यागोविंदाने राहतात. खरेच राहतात? राहत असल्या असत्या तर 'सह अस्तित्वाचे प्रश्न' आपल्याला विचारावे लागले असते का?  भारत प्राचीन काळापासून कायमच सांस्कृतिक अखंडता असणारे, विविध राज्यांत, राज्यपद्धतीत नांदणारे राष्ट्र राहिले आहे. भारतीय विचारात आसेतुहिमाचल राजकीय प्रभुत्वाची, सार्वभौमत्वाची चक्रवर्ती ही संकल्पना आहे. प्राचीन काळापासून भारताने अनेक आक्रमणे झेलली. त्यातली बहुतांश पचवली. आक्रमक भारतीय विचारात, संस्कृतीत एकरूप झाले, मिसळून गेले. आक्रमकांना पचवून, त्यांना आपलंसं करुन सह अस्तित्वाचा एक आदर्श उभा करणारी ही संस्कृती मध्ययुगीन कालखंडाच्या सुरुवातीला आलेल्या, एका धार्मिक आक्रमणाने इतकी कोलमडली कशी? इतकी कोलमडली की त्यामुळे सह अस्तित्वाचे प्रश्न निर्माण होऊ लागले. त्याचे एक कारण निश्चितच भारतीय वैचारिक जगतात आलेले एक औदासिन्य, आत्ममग्नता आणि वाढती सामाजिक विषमता हे आहेच. ते नाका...