Skip to main content

Partition and Unintended consequences


पुस्तकं हा ग्रेट खजिना आहे. कधी, कुठल्या पुस्तकात काय भन्नाट वाचायला मिळेल, काही निराळीच दृष्टी मिळेल काही सांगता येत नाही. उदाहरणार्थ, वसंत पटवर्धन लिखित विष्णुगुप्त चाणक्याच्या आयुष्यावरील 'आर्य' ही कादंबरी. रूढार्थाने ही कादंबरी आहे. त्यावेळी उपलब्ध असलेले सर्व ऐतिहासिक पुरावे, त्यांचा अभ्यास करुन मांडलेली असली तरी शेवटी ती कादंबरीच, तो इतिहास मांडणी करणारा ग्रंथ नव्हे. पण त्या कादंबरीत बौद्ध विचार, बौद्ध पंथाच्या भविष्यातील ऱ्हासाची कारणे, ही चाणक्याच्या गहन चिंतनाचा भाग म्हणून मांडली आहेत. इतिहास ग्रंथात किंवा इतर विश्लेषणात्मक ग्रंथांपेक्षा त्या मांडणीतून तो सर्व मुद्दा अधिक स्पष्टपणे वैयक्तिक पातळीवर मला समजला. आणखी एक उदाहरण, अमेरिकेत साठ आणि सत्तरच्या दशकांत व्हिएतनाम युद्ध, हिप्पी चळवळ, भरकटलेली तरुणाई हा गंभीर प्रश्न झाला होता. या सर्वांची माझी पहिली ओळख झाली पु. ल. देशपांडे यांच्या 'जावे त्यांच्या देशा' या पुस्तकातील 'एक बेपत्ता देश' या लेखातून. उत्सुकता वाढली तेव्हा मग मिळतील साधने वाचून, माहितीपट पाहून हा विषय आणि या विषयाचे अनेक पदर उलगडत गेले. हाच प्रत्यय साक्षेपी संपादक गोविंद तळवलकर यांच्या 'पुष्पांजली' या पुस्तकाच्या वाचनातून येत आहे. 


भारताची फाळणी ही भारताच्या इतिहासात अभूतपूर्व उलथापालथ घडवणारी घटना आहे. या घटनेने भारतीय उपखंडाचा इतिहास, भूगोल, राजकारण बदलले. फाळणीच्या संदर्भात विविध माध्यमांत आणि सामान्य स्तरावर राजकीय, ऐतिहासिक, सामाजिक घटकांची चर्चा होते. आर्थिक परिणाम या घटकाकडे विशिष्ट वर्तुळापलीकडे लक्ष जात नाही. त्यांची सामान्य पातळीवर चर्चा होत नाही. फाळणीमुळे पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान (सध्या बांग्लादेश) मधून आपल्या मिळकती, मालमत्ता सोडून कफल्लक अवस्थेत, निर्वासित म्हणून भारतात आले इथे साधारण चर्चा संपते. पण उद्योग आणि व्यवसायाच्या पातळीवर काही खूपच जटील प्रश्न निर्माण झाले होते. त्यातल्या एकाचा उल्लेख करुन मूळ विषयाकडे जाऊ. 

पूर्व आणि पश्चिम बंगालची फाळणी, नक्की कोणत्या आधारावर झाली हा एक गहन प्रश्न आहे. त्यातल्या एन्क्लेव्ह चा प्रश्न आता काही वर्षांपूर्वी निर्णायकरित्या सुटला. ते असो. तर, फाळणी झाली त्यावेळी आणि आताही बंगाल-आसाम वगैरे प्रदेशात ज्यूटचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. कोलकाता आणि आसपासचा भाग हा ज्यूट मिल साठी प्रसिद्ध होता, किंबहुना कोलकाता एक महानगर म्हणून विकसित होण्यात या ज्यूट मिलचा मोठा वाटा आहे. ज्यूटची शेती, उत्पादन करणारा प्रमुख प्रदेश होता पूर्व बंगाल आणि प्रक्रिया उद्योग कोलकाता मध्ये एकवटलेला होता. फाळणीमुळे पूर्व बंगाल मधल्या शेतकऱ्यांना आपला माल प्रक्रिया उद्योगपर्यंत पोचवण्यात अडचण आणि कोलकाता मधील मिलना कच्च्या मालाचा सुरळीत पुरवठा जवळ जवळ ठप्प. असे अनेक जटील प्रश्न उभे राहिले. वास्तविक हा झाला फाळणीचा प्रत्यक्ष, दृश्य परिणाम. पण फाळणीच्या गदारोळाशी तसा थेट संबंध नसताना सुद्धा जमशेदपूरला टाटा मोटर्स म्हणजे पूर्वीची 'टेल्को' वर परिणाम झाले. तेच फाळणीचे Unintended Consequences. 

गोविंद तळवलकर यांचे 'पुष्पांजली' हे पुस्तक त्यांनी महाराष्ट्र टाइम्स मध्ये प्रदीर्घ काळात जे मृत्युलेख लिहिले त्यांचे एकत्रीकरण आहे. त्यात टेल्कोचे माजी प्रमुख सुमंत मुळगांवकर यांच्यावरील मृत्युलेखात हे Unintended Consequences चे भन्नाट उदाहरण समोर आले. फाळणीपूर्व काळात टेल्को मोटार गाड्या नाही तर रेल्वे इंजिन तयार करत असे. ती साहजिकच कोळशावरील इंजिने असत. त्या इंजिनांचे बॉयलर तयार करणारे कामगार प्रामुख्याने पठाण होते. फाळणीनंतर हा कामगार वर्ग निघून गेला आणि कंपनीपुढे प्रश्न पडला की करायचं काय? आणि त्यातून निर्माण झाली मोटार गाड्या तयार करणारी टेल्को. जी पूर्वी प्रामुख्याने मालवाहतूक करणारे ट्रक इत्यादी तयार करत असे. पुढे रतन टाटांच्या काळात टेल्कोचे रूपांतर 'टाटा मोटर्स' मध्ये झाले आणि ती कंपनी आता मालवाहतूक मोटारींबरोबरच प्रवासी वाहन क्षेत्रात देखील आपला दबदबा राखून आहे. 

हे असं आहे. कधी, कुठला भन्नाट धागा हाती लागेल ते सांगता येत नाही. त्यामुळेच कायम लक्षात ठेवणे गरजेचे आहे, "वाचाल तर वाचाल" तसेच "वाचाल तर समृद्ध व्हाल". 

Comments

Popular posts from this blog

विश्वास कसा ठेवावा?

दिल्लीतील लाल किल्ला परिसरात स्फोट झाला, १२ जण ठार आणि २१ जखमी. ही बातमी ऐकताना आपण पुन्हा एकदा हादरलो. हा हादरा यावेळी अधिक खोल होता. कारण २०११–१२ नंतर जम्मू-कश्मीरच्या संवेदनशील पट्ट्याशिवाय भारतात मोठ्या साखळी स्फोटांची मालिका जवळजवळ थांबली होती. तुरळक घटना झाल्या, पण एकूणात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. “आमचा मुलगा निष्पाप आहे.” “सरकार खोटे आरोप करते.” ही सारवासारवी दरवेळी ऐकताना मनात प्रश्न पुन्हा उभा राहतो,  विश्वास कसा ठेवावा? मणिपूरमधील हल्ल्यानंतर म्यानमार सीमापार कारवाई झाली. उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक, पुलवामा नंतर बालाकोट, पहलगाव हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ चे तांडव झाले.  पण त्यांच्यापेक्षा कितीतरी पट अधिक महत्त्वाच्या, आणि क्वचितच चर्चेत येणाऱ्या, म्हणजे गुप्तचर संस्थांच्या  शंभरपैकी नव्व्याण्णव  यशस्वी कारवाया कटांचे उधळलेले धागे, पकडले गेलेले शस्त्रसाठे, रोखले गेलेले आत्मघातकी हल्ले, आणि वेळेवर अटकसत्रात अडकवलेले दहशतवादी.  २०१५–१६ मध्ये गुजरातच्या समुद्रात पकडून बुडवलेली संशयास्पद बोट असो, कांडला बंदरावर जप्त झालेले प्रचंड अंमली प...

मऱ्हाटीची बोलू कौतुके

छायाचित्र सौजन्य: इंटरनेट  अर्थाचा अनर्थ केला की घोटाळे होतात. कसे?  एक्स (भूतपूर्व ट्विटर) वर 'जेम्स ऑफ बॉलिवूड' नावाचं एक हॅन्डल आहे. हिंदी सिनेसृष्टी, ज्याला बॉलिवूड असं म्हणतात, तिथे ४०-५० च्या काळापासून हिंदू तितुका वाईट, हिंदू चालीरीती तितुक्या वाईट, त्यांची कितीही खिल्ली उडवा पण एक प्रेमळ रहीम चाचा, माय सन वगैरे म्हणणारा पाद्री प्रेमळच असणार याची जंत्री मांडलेली असते. बहुतांश खरी असते. पण त्याच हँडलच्या निर्माते-चालक संजीव नेवर यांनी एका मुलाखतीत एका गोष्टीचा अर्थाचा अनर्थ केला आणि घोटाळा केला.  त्यांनी लता मंगेशकर यांच्या संदर्भातला एक दाखला दिला, की सुरुवातीच्या काळात दिलीप कुमार यांनी लता मंगेशकर यांना उद्देशून एक टोमणावजा वक्तव्य केले की, तुमच्या उर्दूच्या उच्चारात मराठीपणा दिसतो. तर लता मंगेशकर यांनी दीड वर्षे उर्दूची शिकवणी लावून आपले उर्दू उच्चार घोटून घेतले. इतके की कोणाला शंकाही येऊ नये.  त्यावर या नेवर यांचं म्हणणं असं की लता मंगेशकर यांना उर्दू वगैरे शिकण्याची काय गरज होती? आणि त्यांनी ठणकावून सांगण्याची गरज होती की, 'हो, आहे मी मराठी. मग माझ्या उच्...

Mestak: Decolonizing Bharat the Maratha Way

Hemadri Pandit. Decolonisation is not merely the removal of foreign political power. It is the restoration of intellectual confidence. It is the recovery of systems. It is the reclaiming of institutional memory. The Maratha Empire did not simply challenge imperial authority on the battlefield; it reconstructed the civilizational backbone of Bharat. At the heart of that reconstruction lay something deeply profound yet often overlooked: the revival of the ancient Indic tradition of accounting and state book-keeping embodied in the concept of मेस्तक (Mestak). What is Mestak? Mestak was a structured accounting manuscript tradition, a codified format for recording state revenue and expenditure. But more than that, it was a philosophy of governance. The preserved shloka states: लेखकासी हे मेस्तक। नीतिवंता नीतिशास्त्र देखा। राजकी लोकांसि विवेक। प्रकट करी।। लेखणी दिधली ज्याचे हाती। तो स्वीकारिला सरस्वती। लेखनकळा वर्षा आरती। साधली तया I आताही जे असता धरिती येणेप्रमाणे लिहिती। त्यासी पावेल सरस्व...