Skip to main content

स्वातंत्र्यवीर सावरकरांची ईश्वरविषयक विचारप्रणाली

             

                                  'ईश्वर.' जगात जेवढे काही धर्म, जाती, पंथ, समुदाय इ. आहेत ते सगळे कुठल्यातरी ईश्वर नावाच्या अज्ञात शक्तीवर श्रद्धा ठेवून एकत्र आलेले असतात, स्थापन झालेले असतात. प्रत्येक धर्माच्या, जातीच्या ईश्वराबाद्द्लच्या, धार्मिक मान्यताविषयीच्या संकल्पना वेगळ्या असल्या तरी ते श्रद्धेवरच स्थापन झालेले असतात. कित्येक धर्माच्या संस्थापकांनी, तत्वज्ञांनी ईश्वराबद्दल लिहून ठेवलं आहे. हिंदुस्थानात ७००० वर्षांपासून अस्तित्वात असलेला धर्म-संस्कृती म्हणजे 'हिंदू'. 

हिंदू धर्माला कोणताही संस्थापक नाही, धर्मग्रंथ नाही, पण हा धर्म वैदिक आर्यांच्या 'वेद' आणि 'उपनिषदे' यांवर आधारलेला आहे. मुळ 'यज्ञ' संकल्पनेनं ईश्वराचं अस्तित्व मानणाऱ्या हिंदू धर्मात कर्मकांडरुपी  थोतान्डावर  भाष्य केलं. ईश्वराच्या अस्तित्वालाच आव्हान देणारे कित्येक तत्वज्ञ होते पण मूळ वेदांचा सखोल अभ्यास करून हिंदू धर्मातील ईश्वराच्या अस्तित्वाबाद्द्लच्या मुळ  कल्पना आणि वेदांमध्ये अभिप्रेत असलेली विज्ञाननिष्ठ दृष्टी यांवर विस्तृत भाष्य केलं ते विनायक दामोदर सावरकर यांनी. 

भारतीय इतिहासात क्रांतिकारक म्हणून सर्वपरिचित असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा हा पैलू तितका प्रकर्षाने समोर आला नाही, विशेषतः आजच्या तरुण पिढीसमोर.  सावरकरांचे विज्ञाननिष्ठ निबंध आणि हिंदुत्वाची वेदना अभिप्रेत असलेली व्याख्या असलेला 'हिंदुत्व' हा ग्रंथ अतिशय उत्कृष्ट आहे. 

उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार क्रमाक्रमानं काळाच्या ओघात मानवानं निसर्गाच्या विरोधात जाऊन म्हणा किंवा निसर्गाच्या मदतीनं स्वतःचा सांस्कृतिक, समूहात्मक,  विकास केला. मानवानं हा विकास केला खरा पण उन, वारा, पाऊस, धरणीकंप, हिमयुग, इतर नैसर्गिक आपत्ती यांवर समाज म्हणू किंवा त्यांच्या वर विजय मिळवता आला म्हणूनच ह्या निसर्गाला त्यांनी 'देव' हि संकल्पना बहाल केली. ह्या निसर्गाला आपली कृतज्ञता किंवा नैवेद्य अर्पण करण्याचे मार्ग प्रत्येक संस्कृतीत वेगळे वर्णिले गेले पण हिंदू धर्मात ते 'यज्ञ' या संकल्पनेतून केले जाऊ लागले. या यज्ञ या गोष्टीचं काळात ओघात झालेलं विकृतीकरण म्हणजे मूर्तीपूजा..
                      
हिंदू धर्मात मूर्ती ह्या साक्षात देवाचं रूप मानण्यात येतात. त्या मूर्तीत (स्वयंभू किंवा घडवलेल्या) साक्षात त्या सर्वव्यापी देवाचं अस्तित्व असतं असा गाढ विश्वास हिंदू समाजामध्ये आहे. देव जर चराचरात असेल तर 'पूजनीय' फक्त तो मुर्तीताला मुर्तीतलाच देव कसा होऊ शकेल? भक्तांच्या हाकेला हि मूर्ती कशी धावून येवू शकेल? ह्या मूर्त्यांना अभिषेक करण्यासाठी पाण्यापासून ते रक्तापर्यंत बरेच काही खंडोगणती वाया घातले जाते. देवाला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खरच ह्या सगळ्यांची गरज आहे का? देव जर भावाचा भुकेला असेल तर त्याला हे सर्व कशासाठी? भक्ताच्या हाकेला साक्षात देव येत असेल हे धादांत असत्य आणि थोतांड आहे. हिंदुस्थानात कित्येक देवळात विशेषतः देवी मंदिरात आजही चालणारी बळी देण्याची परंपरा हि माणसातली श्रद्धा नाही तर विकृती दर्शवते. स्वतःच्या स्वार्थासाठी मुक्या प्राण्याचा काही ठिकाणी जिवंत मनुष्यप्राण्याचा बळी देणं यासारखी क्रूर आणि निर्लज्ज गोष्ट दुसरी नाही. हिंदुस्थानात देवपण शेंदूर फासल्याबरोबर दगडालादेखील मिळते. 
                      
हिंदू, इजिप्त आणि बर्याच संस्कृतींमध्ये मृत्युनंतरच्या अस्तित्वावर गाढ विश्वास आहे. याच श्रद्धेमुळे, विश्वासामुळे इजिप्तमध्ये मोठमोठे पिरामिड उभे राहिले तर हिंदुस्थानात श्राद्ध-पक्ष यांसारख्या खुळचट कल्पना जन्मल्या. 

मनुष्यदेह नश्वर आहे. वास्तविक मृत्युनंतर त्या निस्तेज देहात काहीही उरलेलं नसतं, त्या देहाचं अस्तित्व मिटवणं हे आद्य कर्तव्य ठरतं . आत्मा, पाप-पुण्याच्या गणितावर स्वर्ग-नरकाच कोष्टक ह्या केवळ मानवी अवास्तव कल्पना आहेत. हिंदू धर्मात अभक्ष्य मानलं गेलेलं मांस श्राद्धाच्या प्रसंगी भक्षण करावं लागतं. पिंडाला कावळा शिवल्याशिवाय मृत व्यक्तिला मुक्ती मिळत नाही. व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याला भडाग्नी दिला तर आत्मा असंतुष्ट राहतो, पण असंतुष्ट राहायला 'आत्मा' नावाची वस्तू असायला हवी ना! ह्या सर्व कल्पना पटकन कोणाच्याहि पटकन पचनी पडणं अवघड आहे. तात्याराव सावरकरांच्या पत्नी जेव्हा  निवर्तल्या तेव्हा त्याचं दहन कुठल्याही संस्काराविना विद्युतदाहिनीत झालं. वर्षश्राद्ध वगैरे कल्पनांना पूर्णपणे फाटा दिला. 
                     
हिंदू धर्मात फक्त मूर्तीच नाही तर प्रण्यानादेखील अलौकिक देवत्व प्राप्त झालेलं आहे. सर्व देवांची वाहनं हि प्राणी मानली गेली आहेत. विष्णू-गरुड, महादेव-नंदी, गणपती-उंदीर. याच देवांचे पृथ्वीवरील अवतार विमानतून फिरत असताना हे सर्वशक्तिमान देव मात्र प्राण्यांना वाहन करून फिरत होते.( पहा रामायण) असेच देवाचं सानिध्य मिळाल्यामुळे वराह, श्वान, बैल इ. पाळीव प्राणी यापलीकडे काहीही उपयुक्त नसलेले प्राणीदेखील पूजनीय झालेले आहेत. पण या सर्वात गाय हा प्राणी अशा काही अलौकिक देवत्वाला पोचला आहे की त्याला तोड नाही. 

पुराणामध्ये गायीला 'कामधेनु' म्हणून संबोधले आहे. वास्तविक गायीपासून मिळालेलं 'दूध' आयुर्वेदानुसार आणि पाश्चात्त्य औषधशास्त्रानुसार संपूर्ण अन्न मानलं गेलेलं आहे. इंधनासाठी उपयुक्त असणार्या गोवऱ्या आणि जैविक इंधन म्हणून वापरली जाणारी विष्ठा, या मनुष्य्प्रण्यासाठी उपयुक्त असणार्या गोष्टी. विज्ञाननिष्ठ निबंधापैकी 'गोपालन हवे- गोपूजन नव्हे' ह्या निबंधात ह्या संबंधी विस्तृत विवेचन केलेलं आहे. 

हिंदुस्थानावर झालेल्या मुस्लिमांच्या आद्य स्वाऱ्यांपासून ते हल्लीपर्यंत मुस्लीम सैन्ये स्वतःच्या सैन्याच्या फालीपुढे गायींचे कळप असत. हिंदू सैन्ये गोहत्येच्या पापाच्या भीतीने शास्त्रच उगारणार नाहीत. ह्या कृत्यांमुळे सैन्येच्या सैन्ये-गावेच्या गावे उध्वस्त केली जात. ह्या गोहत्या पापाच्या भीतीनं कित्येक वेळा हिंदू सैन्यांनी सर्वनाश ओढवून घेतला आहे. वास्तविक वेदांमध्ये गाय हा केवळ एक उपयुक्त पशू हे अशी विवेचने आहेत. हिंदूंनी ह्या पाप-पुण्याचा विचार न करता सैनिकाकडून अभिप्रेत असणारी कर्तव्य केली असती तर सांस्कृतिक, सामाजिक ह्रास बराच टळला असता. सावरकरांनी अखिल आर्यावर्तात समस्त हिंदुनी गाय हा केवळ उपयुक्त पशु आहे ह्या विचारांचा जोरदार प्रचार केला. 

ह्या पाप-पुण्याच्या कल्पनेतून बाहेर काढून सैन्याला कर्तव्याशी तत्पर राहण्याची प्रेरणा आणि शिकवण शिवाजी महाराजांनी दिली. धर्माभिमानी पण कर्तव्यनिष्ठ आदर्श राजा शिवाजी हा चाणक्याच्या 'अर्थशास्त्र' च्या व्याख्येत चपखल बसणारा राजा होता. म्हणूनच धर्माकडे एका वेगळ्या आणि कर्तव्यनिष्ठ दृष्टीने पाहणाऱ्या समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांचं वर्णन 

                 निश्चयाचा महामेरू। बहुतजनासी आधारू।।

                 अखंड स्थितीचा निर्धारु। श्रीमंत योगी।।

 असं केलेलं आहे. 
                    
आजच्या या स्पर्धेच्या युगात, सुशिक्षित जगात वैचारिक दृष्ट्या प्रगल्भ समाजाच्या अस्तित्वाची अपेक्षा होती. पण कित्येक बाबा आणि बुवांचा भक्तवर्ग हा आजचा सुशिक्षित अभियंते, डॉक्टर, नी इतर उच्चविद्याविभूषित स्त्री-पुरुषांचा आहे. आजच्या या जगात सावर्कारंचे धर्माभिमानी, विज्ञाननिष्ठ विचार हे समाजाच्या शाश्वत मानसिक विकासासाठी किती उपयुक्त आहेत हे काळानं सिद्ध केलं  आहे.               

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

डॉ. आंबेडकरांचे आर्थिक चिंतन आणि वर्तमानातील प्रासंगिकता

एक प्रसिद्ध वचन आहे, "some are born great, some achieve greatness and some are those the greatness is thrust on them.." म्हणजे, काही जन्मतःच महान असतात. तर काही आपल्या कार्यातून, कृतीतून महत्पदाला पोचतात. तर काहींवर महानता लादली, थोपली गेलेली असते. प्रस्तुत विषयाला अनुसरून या वचनातला तिसरा भाग अप्रस्तुत आहे. माणूस जन्मतःच महान असतो का? ती जन्मजात महानता त्या माणसाच्या पुढील आयुष्यातील महत्कार्यामुळे सिद्ध होते. थोर, साक्षेपी विचारवंत कुरुंदकर मांडतात त्याप्रमाणे शिवाजी महाराज हे जन्मतःच महान होते असे आपण म्हणतो कारण महाराजांचे संपूर्ण महत्कार्य आपल्या समोर आहे म्हणून. याच न्यायाने भारतीय सामाजिक, राजकीय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक क्षेत्रात आपल्या कृतीतून, कार्यातून महत्पदाला पोचलेले महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्या महामानवाचे महत्कार्य आपल्या समोर आहे, म्हणून आपण अभिमानाने म्हणून शकतो की ते जन्मताच महान होते.  भारतीय समाजमन माणसांना चौकटीत बसवण्यास उत्सुक असते. एकाच झापडबंद दृष्टीने व्यक्ती आणि कार्याकडे बघण्याचा प्रयत्न करते. पण याच भारताची दुसरी ...

मऱ्हाटीची बोलू कौतुके

छायाचित्र सौजन्य: इंटरनेट  अर्थाचा अनर्थ केला की घोटाळे होतात. कसे?  एक्स (भूतपूर्व ट्विटर) वर 'जेम्स ऑफ बॉलिवूड' नावाचं एक हॅन्डल आहे. हिंदी सिनेसृष्टी, ज्याला बॉलिवूड असं म्हणतात, तिथे ४०-५० च्या काळापासून हिंदू तितुका वाईट, हिंदू चालीरीती तितुक्या वाईट, त्यांची कितीही खिल्ली उडवा पण एक प्रेमळ रहीम चाचा, माय सन वगैरे म्हणणारा पाद्री प्रेमळच असणार याची जंत्री मांडलेली असते. बहुतांश खरी असते. पण त्याच हँडलच्या निर्माते-चालक संजीव नेवर यांनी एका मुलाखतीत एका गोष्टीचा अर्थाचा अनर्थ केला आणि घोटाळा केला.  त्यांनी लता मंगेशकर यांच्या संदर्भातला एक दाखला दिला, की सुरुवातीच्या काळात दिलीप कुमार यांनी लता मंगेशकर यांना उद्देशून एक टोमणावजा वक्तव्य केले की, तुमच्या उर्दूच्या उच्चारात मराठीपणा दिसतो. तर लता मंगेशकर यांनी दीड वर्षे उर्दूची शिकवणी लावून आपले उर्दू उच्चार घोटून घेतले. इतके की कोणाला शंकाही येऊ नये.  त्यावर या नेवर यांचं म्हणणं असं की लता मंगेशकर यांना उर्दू वगैरे शिकण्याची काय गरज होती? आणि त्यांनी ठणकावून सांगण्याची गरज होती की, 'हो, आहे मी मराठी. मग माझ्या उच्...

विश्वास कसा ठेवावा?

दिल्लीतील लाल किल्ला परिसरात स्फोट झाला, १२ जण ठार आणि २१ जखमी. ही बातमी ऐकताना आपण पुन्हा एकदा हादरलो. हा हादरा यावेळी अधिक खोल होता. कारण २०११–१२ नंतर जम्मू-कश्मीरच्या संवेदनशील पट्ट्याशिवाय भारतात मोठ्या साखळी स्फोटांची मालिका जवळजवळ थांबली होती. तुरळक घटना झाल्या, पण एकूणात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. “आमचा मुलगा निष्पाप आहे.” “सरकार खोटे आरोप करते.” ही सारवासारवी दरवेळी ऐकताना मनात प्रश्न पुन्हा उभा राहतो,  विश्वास कसा ठेवावा? मणिपूरमधील हल्ल्यानंतर म्यानमार सीमापार कारवाई झाली. उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक, पुलवामा नंतर बालाकोट, पहलगाव हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ चे तांडव झाले.  पण त्यांच्यापेक्षा कितीतरी पट अधिक महत्त्वाच्या, आणि क्वचितच चर्चेत येणाऱ्या, म्हणजे गुप्तचर संस्थांच्या  शंभरपैकी नव्व्याण्णव  यशस्वी कारवाया कटांचे उधळलेले धागे, पकडले गेलेले शस्त्रसाठे, रोखले गेलेले आत्मघातकी हल्ले, आणि वेळेवर अटकसत्रात अडकवलेले दहशतवादी.  २०१५–१६ मध्ये गुजरातच्या समुद्रात पकडून बुडवलेली संशयास्पद बोट असो, कांडला बंदरावर जप्त झालेले प्रचंड अंमली प...