Skip to main content

                               माधवराव बल्लाळ पंतप्रधान 

                    १४ जानेवारी, १७६१ चा पानिपतावरचा पराभव, उत्तरेत माजलेली अंदाधुंदी, दक्षिणेत पुन्हा प्रबळ झालेले निजाम आणि हैदर, बंगाल मधून वाढत असलेला ब्रिटीशांचा प्रभाव या सर्वांवर खंबीरपणे मत करून मराठी साम्राज्याचं सामर्थ्य वाढवलं ते नानासाहेब पेशव्यांचे द्वितीय चिरंजीव माधवराव यांनी . एकवेळ शून्यातून साम्राज्य उभारणं सोपं वाटेल, पण जम बसलेली, बलाढ्य झालेली राज्यसत्ता पानिपातासारख्या आघातानंतर पुन्हा वैभवशाली करणं हे काही सोपं नाही .
                   पानिपतचा आघात, सदाशिवरावभाऊ, विश्वासराव आणि कित्येक सरदार आणि त्यांच्या सैन्याचा मृत्यू झालेला . सदाशिवरावभाऊच्या आणि एकूणच पानिपातामुळे निराशेच्या गर्तेत झालेला नानासाहेब पेशव्यांचा मृत्यू यामुळे अवघ्या सोळाव्या वर्षी माधावारावांवर पेश्वेपदाची जबाबदारी आली . शिस्त ,न्यायानिष्ठुरता, राजकारणच प्रगाढ ज्ञान यांच्या जोरावर अवघ्या ११ वर्षात मराठी साम्राज्य माधवरावांनी पुनर्वैभवाला पोचवलं . राघोबा दादा, भोसले, गायकवाड इ अप्त्साकीय आणि सरदारांचा विरोध  मोडून काढला . हैदरवर वेळोवेळी स्वार्या करून त्याला जवळजवळ आश्रित बनवलं,   राक्षसभूवानाच्या लढाईत निजामाला पराभूत केलं . राक्षसभूवनची लढाई  माधवरावांच्या उत्कृष्ट युद्धडावपेच ज्ञानाची पहिली झलकच होती .निजामाला उपकरात ठेवून त्याच्याशी स्नेह जोडला .
             बंगालमध्ये प्रबळ झालेल्या ब्रिटीशाना माधवराव आणि नंतर नाना फडणीस असेपर्यंत मराठी साम्राज्यात राजकीय हस्तक्षेप करण्याची संधीदेखील मिळाली नाही .  माधवराव, शिवाजी, संभाजी, नाना फडणीस यांच्या परराष्ट्र नीतीचं कौतुक ब्रिटीश आणि पोर्तुगीज इथास्कर खुल्यादिलाने करतात .          
            . होळकर- शिंद्यांनी उत्तरेतलं रोहिल्यांचं बंद मोडून काढून नजीबच्या थडग्याची वासलात लावली . उत्तरेतली परिस्थिती सावरली . रामशास्त्री प्रभूण्यांसारखे न्यायाधीश, नाना फडनिसंसारखे कारभारी आणि मुत्सद्दी, तुकोजी होळकर,  महादजी शिंदे इ व्यक्तिमत्व पुढे आणण्यात माधवरावांचा सिंहाचा वाट आहे . अशा कर्तबगार, मुत्सद्दी आणि चतुर पेशव्याचा घरातील अंतर्गत कलह  आणि राज्याक्ष्मासारख्या रोगाने घात केला . ब्रिटीश इतिहासकार ग्रांट डफ्फ म्हणतो .......

                                      "या तरुण पेशव्याचा अकाली मृत्यू म्हणजे 

                                      मराठी साम्राज्याच्या जिव्हारी लागलेला 

                                      त्यापुढे पानिपतचा आघात काहीच नव्हे ."


                    ( ११ वीत असताना काढलेले हे चित्र, खूप लोकांनी आवडल्याचे सांगितले. आणि मग असे चित्र काढत राहण्याचा ध्यास लागला. म्हणूनच की काय माझी चित्रकला त्यातच अडकून पडली आहे…. )

Comments

Popular posts from this blog

अथातो बिंब जिज्ञासा

अथातो ब्रह्म जिज्ञासा, असे म्हणत ऋषीमुनींनी या विश्वाचे रहस्य जाणून घेण्यासाठी गहन चर्चा केल्या. त्याचे रूपांतर वेद-उपनिषद, पुराणे यात झाले. त्यासोबतच एक प्रगल्भ समाज उभा राहिला, त्यांच्या पूजा पद्धती, उपासना पद्धती विकसित होत गेल्या. त्या क्रमाने विकसित होत निसर्ग-नैसर्गिक शक्तींची पूजा, यज्ञाद्वारे आहुती देणे ते प्रतीक निर्माण ते प्रतिमा निर्मिती इथवर पोचल्या. श्रेष्ठ मूर्तिविज्ञान साधक, संशोधक डॉ. गोरक्षनाथ तथा गो. ब. देगलूरकर, मांडतात, "ऋग्वेदात श्री विष्णूच्या संबंधी सहा ऋचा आहेत, त्या एका अर्थी विष्णूच्या 'शाब्दिक प्रतिमाच' आहेत. या शाब्दिक प्रतिमेचे प्रत्यक्ष प्रतिमेत रुपांतर करण्यासाठी पाषाण वापरले गेले. ते मग एका कुंपणाने बंदिस्त केले गेले. त्याला 'नारायण वाटक' म्हणू लागले" मूर्ती घडवणे, त्यांचे उपासना, पूजा यातील वाढते महत्त्व, त्यांचे अर्थ हा विषय गहन आहे तरीही उद्बोधक आहे. हाच देगलूरकर यांचा ध्यास आहे. तो आजवर अनेक पुस्तकांमधून समोर आला आहेच, त्यात 'अथातो बिंब जिज्ञासा' या टागोर फेलोशिप साठी लिहिलेल्या थिसीसची भर पडली आहे. तोच थिसीस मूर्ती,...

डॉ. आंबेडकरांचे आर्थिक चिंतन आणि वर्तमानातील प्रासंगिकता

एक प्रसिद्ध वचन आहे, "some are born great, some achieve greatness and some are those the greatness is thrust on them.." म्हणजे, काही जन्मतःच महान असतात. तर काही आपल्या कार्यातून, कृतीतून महत्पदाला पोचतात. तर काहींवर महानता लादली, थोपली गेलेली असते. प्रस्तुत विषयाला अनुसरून या वचनातला तिसरा भाग अप्रस्तुत आहे. माणूस जन्मतःच महान असतो का? ती जन्मजात महानता त्या माणसाच्या पुढील आयुष्यातील महत्कार्यामुळे सिद्ध होते. थोर, साक्षेपी विचारवंत कुरुंदकर मांडतात त्याप्रमाणे शिवाजी महाराज हे जन्मतःच महान होते असे आपण म्हणतो कारण महाराजांचे संपूर्ण महत्कार्य आपल्या समोर आहे म्हणून. याच न्यायाने भारतीय सामाजिक, राजकीय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक क्षेत्रात आपल्या कृतीतून, कार्यातून महत्पदाला पोचलेले महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्या महामानवाचे महत्कार्य आपल्या समोर आहे, म्हणून आपण अभिमानाने म्हणून शकतो की ते जन्मताच महान होते.  भारतीय समाजमन माणसांना चौकटीत बसवण्यास उत्सुक असते. एकाच झापडबंद दृष्टीने व्यक्ती आणि कार्याकडे बघण्याचा प्रयत्न करते. पण याच भारताची दुसरी ...

आर्थिक गुन्हेगारी: प्राचीन भारतीय विचार, वर्तमान आणि भविष्य

फोटो सौजन्य: एलिट मॅग द्वारा इंटरनेट  एक हजार रुपयाची वस्तू आपण विकत घेत असतो. दुकानदार विचारतो, बिल देऊ का? या प्रश्नाची हो किंवा नाही अशी दोन उत्तरे संभवतात. जर उत्तर हो असे दिले तर ती वस्तू उदाहरणार्थ दहा टक्के जीएसटी लागून अकराशे रुपयांना मिळेल. जर उत्तर नाही असे दिले तर तीच वस्तू हजार रुपयांनाच मिळेल. यात आपण शंभर रुपये वाचवतो. पण आपल्याही नकळत सूक्ष्म पातळीवर एका आर्थिक गुन्हेगारीला उत्तेजन दिलेले असते. कसे? बिल न घेता वस्तू खरेदी केली. त्याचे नगदी पैसे चुकते केले. पण ती गोष्ट कुठल्याही हिशेबाचा भाग नाही झाली. देवाण-घेवाण झालेली नगद ही बेहिशेबी संपत्ती झाली. (आता UPI च्या काळात अशा गोष्टी खूप कमी झाल्या आहेत, पण मुद्द्याच्या अनुषंगाने उदाहरण घेऊन पुढे जाऊ) आर्थिक गुन्हेगारीचे हे अत्यंत प्राथमिक स्वरुप झाले. कायदेशीरदृष्ट्या ते फारसे गंभीर नसेलही पण नैतिकदृष्ट्या नक्कीच आहे.  आर्थिक गुन्हेगारी ही अशा प्राथमिक, सुप्त अवस्थेपासून सुरु होते आणि त्याचे स्वरूप प्राथमिक ते उच्च पातळीवरचा भ्रष्टाचार, हिशेब वह्यांतील प्राथमिक गडबड ते प्रचंड मोठा आर्थिक घोटाळा, प्राथमिक स्तरावरील ...