Skip to main content

बदल...



                काळ आला कठीण!… काय आहे कठीण? वेग. कसला वेग? आयुष्याचा वेग. बदलाचा वेग. बदल. कोणते बदल? सगळ्या प्रकारचे बदल. स्मार्टफोनच APP, स्मार्टफोन- कंप्युटरचे हार्डवेअर, सोशल नेटवर्किंग, प्रायव्हेट बोलणी , तीही वर्च्युअल. सगळंच कसं बदलत चाललंय. जमाने के साथ कदम मिलाओ, वरना जमाना तुम्हे कुचलकर आगे निकाल जायेगा. हाच आजच्या काळाचा मूलमंत्र आहे. जो ना तुम्ही थांबवू शकत, ना मी. या बदलांच्या प्रवाहात, वेगात वाहत जाणं हे आणि हेच आवश्यक आहे.  बदल. बदल काय फक्त तंत्रज्ञानातच आहे काय? एकंदर आयुष्यच बदलू लागलं आहे. प्रचंड वेगवान होऊ लागलं आहे. नाती-भावना, त्याचं प्रदर्शन करणं-न करणं. त्यांच्यात येऊ लागलेला व्यवहारीपणा, त्यांच्यातली निवळ कर्तव्याची जाणीव. कुठल्याही भावभावनांशिवायची. बदल. बदल नात्यांमधला. रक्ताच्याच नाही तर मनाच्या, इमोशन्सच्या. मैत्रीच्या व्याख्या बदलू लागल्या आहेत. रिलेशनशिप, प्रेम, कमिटमेंट यात ' Use and Throw' वृत्ती वाढायला लागली आहे. वेग. प्रचंड वेग आहे बदलांचा. कधी कधी आणि काही बाबतीत झेपत नाही हा वेग. म्हणून आम्ही वेगळे पडतो. काही वेळा पडले जातो. काही का असेना, आहोत आम्ही वेगळे!!
               अपडेट आले की स्मार्टफोनवर वा इतर कशावर त्याच्यासाठी वेळ खर्च करा. वास्तविक काही बेसिक गोष्टींव्यतिरिक्त स्मार्टफोन फार काही वेगळं असं देतात असं वाटत नाही.  तसा अनुभवही आलेला नाही. अर्थात प्रत्येकाच्या वापरण्याच्या पद्धतीत फरक असतोच म्हणा. WhatsApp, Facebook या गोष्टी आज जवळजवळ मुलभूत गरज बनलेल्या आहेत. पण त्याचा एका मर्यादेपलीकडे वापर कंटाळवाणा व्हायला लागतो, कारण मुळातच स्वभावात स्थिरता नाही. सतत वेगळेपणाची हाव असते. दुसरी गोष्ट गाणी. जीवाच्या शांततेसाठीचा प्रचंड मोठा आधार आहे तो. निदान मी जी गाणी किंवा संगीत ऐकतो तो तरी नक्कीच शांततेचा, मानसिक स्थैर्याचा आधार आहे माझ्यासाठी. ती एक गरज अधोरेखित करता येऊ शकते. बाकी सेल्फी, ते सतत अपलोड करणं, त्यावर फेसबुक किंवा इतर ठिकाणी फुकटच्या चर्चा करणं  बुद्धीबाहेरचं आहे. मूर्खपणाचं वाटतं. आता या गोष्टींमुळे जर आम्ही मागासलेले, वेगळे वाटत असू, त्यास आमचा इलाज नाही. आम्ही आहोत वेगळे!!
             So Called पाश्चात्त्य जगाचा प्रभाव आजच्या आमच्या युवा पिढीवर आहे. ही पाश्चात्त्य संस्कृती किंवा 'Western Culture' म्हणजे नक्की काय? मुक्तता, विचार-आचार स्वातंत्र्य. पण ही मुक्तता उद्दामपणाकडे झुकत असेल तर? तर काय? यातून माज वाढेल, बाकी काही नाही. यातून सुरक्षितता कमी होत चालली आहे. बारीकसारीक गोष्टींचं पर्यवसान डिप्रेशन, फ़्रस्ट्रेशन आणि त्यातून व्यसनाधीनता. Western Culture मधून नक्की काय अभिप्रेत आहे? स्वातंत्र्य-सुसंस्कृततेच्या बंधनात असेललं, भोगलेलं स्वातंत्र्य की असंस्कृततेतून वाढणारा स्वैराचार? Western Culture म्हणजे काय? पार्ट्या, पब्ज इ. माझं तोकडं ज्ञान इतपतच येउन थांबतं. पण यापलीकडेही बरंच काही आहे. ही गरज आहे? मला तरी नाही वाटत. या गोष्टींसाठी पैसा लागतो, ही वस्तुस्थिती आहे. त्या खर्च होणाऱ्या पैशातून निष्पन्न काय होतं? चार घटका करमणूक. हिडीस करमणूक. बाकी काही नाही. आधीपासून हा विचार अंगात भिनलेला होता म्हणा किंवा चार चांगल्या लोकांच्या सहवासातून, वाचनातून विचार वाढत गेला म्हणून म्हणा, आजपर्यंत तरी या सगळ्यापासून दूर आहे. आता या गोष्टी जर इतरांना मागासलेपणाच्या वाटत असतील. वेगळेपणाच्या वाटत असतील, तर आमचा इलाज नाही. आम्ही आहोत वेगळे!!
                रिलेशनशिप, कमीटमेंट, प्रेम आजकाल पावसाळ्यानंतर माजलेल्या तणासारखं पसरलंय. काही धरबंध राहिलेला नाही. शाळकरी मुला-मुलींपासून ते पुढे….  शाळकरी वयातलं ते केवळ आकर्षण असतं. त्यांची धाव कुठवर जाते याची चिकित्सा करण्यात काहीच हशील नाही. कारण ते वयच तसं असतं. पण 'पुढे' काय? परिस्थिती अत्यंत वाईट आहे. 'होईल तोपर्यंत होईल, नाहीतर होऊ वेगळे' हा आजचा attitude आहे. जुळण्याच्यापेक्षा जास्त प्रमाण 'Break Up' चं आहे. क्षुल्लक कारणांवरून ब्रेक उप होतात. क्षुल्लक कारणांवरून गोष्टी या थराला जात असतील तर त्या रिलेशनशिप मधल्या खरेपणाची खोली कळते. वास्तविक काही खोली नसतेच. असल्या उथळ नात्यांना कितीसं आयुष्य असणार? रिलेशनशिप मध्ये असणं ही गरज बनू लागली आहे. ग्रूप मधले सगळेच कोणाशी ना कोणाशी रिलेशन मध्ये आहेत म्हणून आपणही असावं, असली उदाहरणं भरपूर दिसतात. काय अर्थ आहे त्याला?  एकमेकांच्या आयुष्याशी खेळल्यासारखं आहे ते. हा आणि असा विचार आम्ही करतो म्हणून आम्ही मागासलेले, वेगळे ठरतो. वेगळे पडतो. आम्ही आहोतच वेगळे!!
            हाताची पाच बोटं सारखी नसतात. प्रत्येक मनुष्य काही वेगळा विचार-आचार घेऊन आलेला असतो. वर उल्लेखलेल्या मुद्द्यांवर कोणी सहमत असेलच असं नाही. प्रत्येकाची आपापली वेगळी मतं असतात. त्यामुळेच प्रत्येकजण आपापल्या दृष्टीने वेगळा असतो. हे वेगलेपणच त्याची ओळख असते. ओळख तयार करते. … आम्ही आहोतच वेगळे..!!!

Comments

Popular posts from this blog

डॉ. आंबेडकरांचे आर्थिक चिंतन आणि वर्तमानातील प्रासंगिकता

एक प्रसिद्ध वचन आहे, "some are born great, some achieve greatness and some are those the greatness is thrust on them.." म्हणजे, काही जन्मतःच महान असतात. तर काही आपल्या कार्यातून, कृतीतून महत्पदाला पोचतात. तर काहींवर महानता लादली, थोपली गेलेली असते. प्रस्तुत विषयाला अनुसरून या वचनातला तिसरा भाग अप्रस्तुत आहे. माणूस जन्मतःच महान असतो का? ती जन्मजात महानता त्या माणसाच्या पुढील आयुष्यातील महत्कार्यामुळे सिद्ध होते. थोर, साक्षेपी विचारवंत कुरुंदकर मांडतात त्याप्रमाणे शिवाजी महाराज हे जन्मतःच महान होते असे आपण म्हणतो कारण महाराजांचे संपूर्ण महत्कार्य आपल्या समोर आहे म्हणून. याच न्यायाने भारतीय सामाजिक, राजकीय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक क्षेत्रात आपल्या कृतीतून, कार्यातून महत्पदाला पोचलेले महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्या महामानवाचे महत्कार्य आपल्या समोर आहे, म्हणून आपण अभिमानाने म्हणून शकतो की ते जन्मताच महान होते.  भारतीय समाजमन माणसांना चौकटीत बसवण्यास उत्सुक असते. एकाच झापडबंद दृष्टीने व्यक्ती आणि कार्याकडे बघण्याचा प्रयत्न करते. पण याच भारताची दुसरी ...

मऱ्हाटीची बोलू कौतुके

छायाचित्र सौजन्य: इंटरनेट  अर्थाचा अनर्थ केला की घोटाळे होतात. कसे?  एक्स (भूतपूर्व ट्विटर) वर 'जेम्स ऑफ बॉलिवूड' नावाचं एक हॅन्डल आहे. हिंदी सिनेसृष्टी, ज्याला बॉलिवूड असं म्हणतात, तिथे ४०-५० च्या काळापासून हिंदू तितुका वाईट, हिंदू चालीरीती तितुक्या वाईट, त्यांची कितीही खिल्ली उडवा पण एक प्रेमळ रहीम चाचा, माय सन वगैरे म्हणणारा पाद्री प्रेमळच असणार याची जंत्री मांडलेली असते. बहुतांश खरी असते. पण त्याच हँडलच्या निर्माते-चालक संजीव नेवर यांनी एका मुलाखतीत एका गोष्टीचा अर्थाचा अनर्थ केला आणि घोटाळा केला.  त्यांनी लता मंगेशकर यांच्या संदर्भातला एक दाखला दिला, की सुरुवातीच्या काळात दिलीप कुमार यांनी लता मंगेशकर यांना उद्देशून एक टोमणावजा वक्तव्य केले की, तुमच्या उर्दूच्या उच्चारात मराठीपणा दिसतो. तर लता मंगेशकर यांनी दीड वर्षे उर्दूची शिकवणी लावून आपले उर्दू उच्चार घोटून घेतले. इतके की कोणाला शंकाही येऊ नये.  त्यावर या नेवर यांचं म्हणणं असं की लता मंगेशकर यांना उर्दू वगैरे शिकण्याची काय गरज होती? आणि त्यांनी ठणकावून सांगण्याची गरज होती की, 'हो, आहे मी मराठी. मग माझ्या उच्...

Mestak: Decolonizing Bharat the Maratha Way

Hemadri Pandit. Decolonisation is not merely the removal of foreign political power. It is the restoration of intellectual confidence. It is the recovery of systems. It is the reclaiming of institutional memory. The Maratha Empire did not simply challenge imperial authority on the battlefield; it reconstructed the civilizational backbone of Bharat. At the heart of that reconstruction lay something deeply profound yet often overlooked: the revival of the ancient Indic tradition of accounting and state book-keeping embodied in the concept of मेस्तक (Mestak). What is Mestak? Mestak was a structured accounting manuscript tradition, a codified format for recording state revenue and expenditure. But more than that, it was a philosophy of governance. The preserved shloka states: लेखकासी हे मेस्तक। नीतिवंता नीतिशास्त्र देखा। राजकी लोकांसि विवेक। प्रकट करी।। लेखणी दिधली ज्याचे हाती। तो स्वीकारिला सरस्वती। लेखनकळा वर्षा आरती। साधली तया I आताही जे असता धरिती येणेप्रमाणे लिहिती। त्यासी पावेल सरस्व...