Skip to main content

पंजाब नॅशनल बँक: आर्थिक क्षेत्र हादरवणारा घोटाळा






                भारतीय आर्थिक क्षेत्र मोठ्या संक्रमणाच्या काळातून जात आहे.1991 च्या आर्थिक सुधारणांनंतर भारतीय अर्थव्यवस्था आमूलाग्र बदलली. स्वातंत्र्यानंतरच्या चार दशकांपासून बसलेली घडी पूर्णपणे बदलली . .1991च्या मोठ्या आर्थिक सुधारणांनंतर दोन दशके नवी व्यवस्था मूळ धरत गेली आणि त्यासाठीच्या बारीकसारीक सुधारणा होत गेल्या. त्यानंतर 2016 आणि 2017 ही वर्षे 'जबरदस्त घुमाव' देणारी ठरली. दरम्यानच्याच काळात भारतीय रिझर्व्ह बँकेने भारतातील बँकांत 'ऍसेट क्वालिटी रिव्ह्यू' करण्यात आला. त्यानुसार बँकांतील प्रचंड प्रमाणातील अनुत्पादक कर्जे बाहेर आली. त्या अनुत्पादक कर्जांचा आकडा 10 लाख कोटी रुपयांवर गेला आहे. त्याच वेळी बँकांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि बुडालेली, अनुत्पादक कर्जांच्या रकमेतून जास्तीत जास्त रक्कम वसूल व्हावी यासाठी रिझर्व्ह बँक विवीध योजना राबवत आहे. त्याचप्रमाणे सरकार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या पुनर्भांडवलीकरणाची योजना अंमलात आणत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भारतातील संबंध बँकिंग आणि आर्थिक विश्वात खळबळ माजवणारा पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळा उघडकीस आला आहे. सदर घोटाळ्यातील अफरातफरीची रक्कम 11,400 कोटी इतकी आहे(?). घोटाळा उघडकीस आल्यानंतर राजकीय क्षेत्रात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले.  आर्थिक क्षेत्रात, शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली. पंजाब नॅशनल बँकेच्या शेअरची किंमत तब्बल ९ टक्क्यांनी उतरली. एकरात्रीत गुंतवणुकदारांनी आपले 3000 कोटी गमावले. हे सर्व उघडकीला येण्याची सुरुवात पंजाब नॅशनल बँकेतून झाली आणि त्याचे इतर बँकेतील धागेदोरे समोर यायला सुरुवात झाली. ह्या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी प्रसिद्ध हिरे व्यापारी नीरव मोदी आणीबाणी पंजाब नॅशनल बँकेतील अधिकारी, कर्मचारी आहेत. सदर बेकायदेशीर व्यवहार 2011 पासून सुरु होते. तर काय आहे हा घोटाळा? कशा पद्धतीने केला गेला? कोण आणि कसे सामील होते? ह्याचे परिणाम काय? इत्यादी प्रश्नांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न आहे.

उघडकीस आला कसा?
5 फेब्रुवारी रोजी पंजाब नॅशनल बँकेनेच मुंबई शेअर बाजाराला बँकेतील 280 कोटी रुपयांच्या घोटाळ्याची कल्पना दिली . 14 फेब्रुवारी रोजी ह्याच बाबतीत अधिक पुढे जात आणखी गैरव्यवहारांची माहिती शेअर बाजाराला कळवण्यात आली. हे गैरव्यवहार 2011 पासून सुरु होते असे ह्या माहितीत नमूद करण्यात आले होते. त्यानंतर ह्या गैरव्यवहारांचे आंतरराष्ट्रीय स्वरूप समोर आले. आणि गैरव्यवहाराची रक्कम 1771.7 दशलक्ष डॉलर म्हणजेच11,400 कोटी रुपये असल्याचे समोर आले. ही रक्कम पंजाब नॅशनल बँकेच्या एकूण भांडवलाच्या एकतृतीयांश होती. वास्तविक ही रक्कम आणि गैरव्यवहार फक्त पंजाब नॅशनल बँकेपुरती मर्यादित नाही. भारतीय बँकांच्या परदेशातील शाखा आणि काही परदेशी बँकादेखील ह्या सर्वात आहेत. हा घोटाळा उघडकीस येण्यास पंजाब नॅशनल बँकेतून नीरव मोदी यांच्या कंपनीला परदेशातून कच्च्या हिऱ्यांच्या आयातीसाठी 'पतपत्रे' (Letters of Understanding) तयार करण्यासाठी योग्य ती पडताळणी जानेवारी 2018 च्या शेवटी आणि फेब्रुवारी मध्ये केली तेव्हा ह्या आणि अशा कंपन्यांना पतपत्रे देताना कोणतेही तारण ठेवले गेले नाही. योग्य त्या कागदपत्रांची पडताळणी झाली नसल्याचे लक्षात आले.

काय आहेत पतपत्रे  (Letters of Understanding)?

पतपत्रे ही एका बँकेने आपल्या ग्राहकाच्या वतीने, दुसऱ्या बँकेला दिलेली हमी असते. पतपत्र हे एकप्रकारे ग्राहकाला अल्पकालीन कर्जउभारणीसाठी दिलेली हमी असते. पतपत्रे मुख्यतः भारतातील व्यापारी, उद्योजक यांना परदेशातून कच्चा माल किंवा इतर वस्तू आयात करण्यासाठी जी रक्कम अदा करावी लागते त्या व्यवहाराच्या सुलभतेसाठी तयार केली जातात. ह्यात सर्व प्रक्रियेत मुख्यतः चार घटक समाविष्ट असतात. पतपत्र तयार आणि जारी करणारी बँक, ज्या बँकेला देण्यात आले आहे ती बँक, आयातदार आणि परदेशातील लाभधारक. ह्या पतपत्रांची मुदत30 दिवस ते 1 वर्ष असते. साधारणतः ती 180 दिवस असते. ही पतपत्रे एका बँकेकडून दुसऱ्या बँकेकडे 'सोसायटी फॉर वर्ल्डवाईड इंटरबँक फायनांशियल टेलिकम्युनिकेशन' (SWIFT) ह्या प्रणालीद्वारे पाठवली जातात. SWIFT द्वारे पाठवणी झाली आहे याचा अर्थ बँकेने पतपत्र जारी करताना सर्व पडताळणी केली आहे आणि सर्व घटकांची त्यास संमती आहे.
          पतपत्रे येण्याच्या आधी अशा पद्धतीच्या व्यवहारांसाठी 'लेटर्स ऑफ कंफर्ट' जारी केली जात असत. जी आयातदाराच्या बँकेने आयातदारासाठी जारी केलेली असत. त्याअंतर्गत आयातदाराला अल्पकालीन 'कर्ज' मिळत असे. त्या विशिष्ट काळात त्या आयातदाराने निर्यातदाराला योग्य ती रक्कम अदा करणे आवश्यक असे. ह्यात उशीर किंवा अदा करण्यात चूक झाली तर जारी करणारी बँक मध्यस्थी करून व्यवहार पूर्ण करत असे. पतपत्रे आयातदाराला जागतिक बँकिंग क्षेत्राचे अवकाश खुले करून देतात. ज्याच्या जोरावर आयातदाराची अल्पकालीन खरेदी कर्ज उभारणीची मर्यादा वाढते.

नीरव मोदी आणि पंजाब नॅशनल बँक, गैरव्यवहार नेमके काय झाले? 

नीरव मोदी प्रकरणात पंजाब नॅशनल बँकेने, नीरव मोदी यांच्या स्टेलर डायमंड्स ह्या कंपनीसाठी SWIFT प्रणालीद्वारे परदेशातील भारतीय बँकांच्या नावे पतपत्रे जारी केली. त्याद्वारे नीरव मोदी यांच्या कंपन्यांनी मोठमोठी अल्पकालीन खरेदी कर्जे विविध बँकां कडून उभारली. पण पंजाब नॅशनल बँकेने हे व्यवहार त्यांच्या कोअर बँकींग सोल्युशन (CBS) प्रणाली मध्ये दाखवले नाही. वास्तविक रिझर्व्ह बँकेच्या नियमावलीनुसार प्लॅटिनम, पॅलॅडियम, ऱ्होडियम, चांदी आणि पैलू न पडलेले किंवा पाडलेले हिरे ह्या वस्तूंच्या आयातीसाठी खरेदी कर्जाची कालमर्यादा 90 दिवसापेक्षा जास्ती असता काम नये.  अशाच प्रकारचा एक व्यवहार पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील ब्रँडी हाऊस शाखेतून16 जानेवारी 2018 रोजी करण्याची विनंती सदर कंपन्यांनी केली होती. त्या वेळी बँकेने योग्य ती कागदपत्रे आणि व्यवहारासाठी नगद रकमेचे तारण असण्याची मागणी केली तेव्हा ह्या कंपन्यांनी आपण विना तारण, कागदपत्रे अशा पद्धतीचे व्यवहार करत असल्याचे नमूद केले. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी अशा पद्धतीचे जुने व्यवहार तपासले असता ह्यातील गैरव्यवहार पुढे  लक्षात आला आणि त्याचा आवाका प्रचंड मोठा होता. म्हणूनच उघडकीला येण्याची सुरुवात झाली ती 280 कोटी रुपयांचे गैरव्यवहार आहेत असे शेअर बाजाराला कळवण्यापासून. ह्या प्रकरणी पंजाब नॅशनल बँकेचा उपव्यवस्थापक दर्जाचा निवृत्त अधिकारी गोकुळनाथ शेट्टी यांना प्रथम अटक करण्यात आली. त्यानंतर हे अटकसत्र सुरूच असून पंजाब नॅशनल बँकेच्या वरिष्ठ अधिकारी आणि संचालक मंडळावर टीका केली जात आहे.

ह्या घोटाळ्याचे परिणाम? 

सर्वात पहिला आणि सर्वात महत्वपूर्ण परिणाम म्हणजे आधीच अनुत्पादक कर्जांच्या बोज्याखाली असणाऱ्या बँक अधिकच अडचणीत आल्या आहेत. रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकार बँकांचे ताळेबंद साफ करून त्यांना पुन्हा कर्जवाटपासाठी सक्षम करण्यासाठी काम करत आहेत. त्यात ह्या घोटाळ्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. दुसरा परिणाम इतर बँका,  ज्यांनी पंजाब नॅशनल बँकेने जारी केलेल्या पतपत्रांच्या आधारे नीरव मोदी यांच्या कंपन्यांना जी कर्जे दिली बुडाल्यात जमा आहेत. ह्यात सार्वजनिक क्षेत्रातील अलाहाबाद बँक आणि खासगी क्षेत्रातील ऍक्सिस बँक आघाडीवर आहेत. त्या बँकांचे नुकसान पंजाब नॅशनल बँकेला भरून द्यावे लागणार आहे. तिसरा परिणाम शेअर बाजार आणि एकंदरच आर्थिक क्षेत्रावर झाला आहे. 36000 ची अत्युच्च पातळी गाठल्यानंतर मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजार सतत उतरतो आहे. त्यात हा घोटाळा बाहेर आल्यानंतर बँकांच्या शेअरची किंमत मोठ्या प्रमाणात घसरली. पंजाब नॅशनल बँकेचा शेअर 9 टक्क्यांनी उतरला. त्या बँकेचे भांडवल मूल्य मोठ्या प्रमाणात कमी झाले.


पूर्वप्रसिद्धी: साप्ताहिक 'स्वतंत्र नागरिक'

Comments

Popular posts from this blog

डॉ. आंबेडकरांचे आर्थिक चिंतन आणि वर्तमानातील प्रासंगिकता

एक प्रसिद्ध वचन आहे, "some are born great, some achieve greatness and some are those the greatness is thrust on them.." म्हणजे, काही जन्मतःच महान असतात. तर काही आपल्या कार्यातून, कृतीतून महत्पदाला पोचतात. तर काहींवर महानता लादली, थोपली गेलेली असते. प्रस्तुत विषयाला अनुसरून या वचनातला तिसरा भाग अप्रस्तुत आहे. माणूस जन्मतःच महान असतो का? ती जन्मजात महानता त्या माणसाच्या पुढील आयुष्यातील महत्कार्यामुळे सिद्ध होते. थोर, साक्षेपी विचारवंत कुरुंदकर मांडतात त्याप्रमाणे शिवाजी महाराज हे जन्मतःच महान होते असे आपण म्हणतो कारण महाराजांचे संपूर्ण महत्कार्य आपल्या समोर आहे म्हणून. याच न्यायाने भारतीय सामाजिक, राजकीय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक क्षेत्रात आपल्या कृतीतून, कार्यातून महत्पदाला पोचलेले महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्या महामानवाचे महत्कार्य आपल्या समोर आहे, म्हणून आपण अभिमानाने म्हणून शकतो की ते जन्मताच महान होते.  भारतीय समाजमन माणसांना चौकटीत बसवण्यास उत्सुक असते. एकाच झापडबंद दृष्टीने व्यक्ती आणि कार्याकडे बघण्याचा प्रयत्न करते. पण याच भारताची दुसरी ...

मऱ्हाटीची बोलू कौतुके

छायाचित्र सौजन्य: इंटरनेट  अर्थाचा अनर्थ केला की घोटाळे होतात. कसे?  एक्स (भूतपूर्व ट्विटर) वर 'जेम्स ऑफ बॉलिवूड' नावाचं एक हॅन्डल आहे. हिंदी सिनेसृष्टी, ज्याला बॉलिवूड असं म्हणतात, तिथे ४०-५० च्या काळापासून हिंदू तितुका वाईट, हिंदू चालीरीती तितुक्या वाईट, त्यांची कितीही खिल्ली उडवा पण एक प्रेमळ रहीम चाचा, माय सन वगैरे म्हणणारा पाद्री प्रेमळच असणार याची जंत्री मांडलेली असते. बहुतांश खरी असते. पण त्याच हँडलच्या निर्माते-चालक संजीव नेवर यांनी एका मुलाखतीत एका गोष्टीचा अर्थाचा अनर्थ केला आणि घोटाळा केला.  त्यांनी लता मंगेशकर यांच्या संदर्भातला एक दाखला दिला, की सुरुवातीच्या काळात दिलीप कुमार यांनी लता मंगेशकर यांना उद्देशून एक टोमणावजा वक्तव्य केले की, तुमच्या उर्दूच्या उच्चारात मराठीपणा दिसतो. तर लता मंगेशकर यांनी दीड वर्षे उर्दूची शिकवणी लावून आपले उर्दू उच्चार घोटून घेतले. इतके की कोणाला शंकाही येऊ नये.  त्यावर या नेवर यांचं म्हणणं असं की लता मंगेशकर यांना उर्दू वगैरे शिकण्याची काय गरज होती? आणि त्यांनी ठणकावून सांगण्याची गरज होती की, 'हो, आहे मी मराठी. मग माझ्या उच्...

Mestak: Decolonizing Bharat the Maratha Way

Hemadri Pandit. Decolonisation is not merely the removal of foreign political power. It is the restoration of intellectual confidence. It is the recovery of systems. It is the reclaiming of institutional memory. The Maratha Empire did not simply challenge imperial authority on the battlefield; it reconstructed the civilizational backbone of Bharat. At the heart of that reconstruction lay something deeply profound yet often overlooked: the revival of the ancient Indic tradition of accounting and state book-keeping embodied in the concept of मेस्तक (Mestak). What is Mestak? Mestak was a structured accounting manuscript tradition, a codified format for recording state revenue and expenditure. But more than that, it was a philosophy of governance. The preserved shloka states: लेखकासी हे मेस्तक। नीतिवंता नीतिशास्त्र देखा। राजकी लोकांसि विवेक। प्रकट करी।। लेखणी दिधली ज्याचे हाती। तो स्वीकारिला सरस्वती। लेखनकळा वर्षा आरती। साधली तया I आताही जे असता धरिती येणेप्रमाणे लिहिती। त्यासी पावेल सरस्व...