Skip to main content

गांधार ते तालिबान: The Afghan Connection


अफगाणिस्तान हे कोडं आहे. सध्याच्या काळात साम्राज्यांची दफनभूमी अशी प्रमुख ओळख कायम झाली आहे. पण प्राचीन काळात याच  भूभागात संस्कृतीचे मळे फुलले. पश्चिम आणि उत्तरेकडून भारतावर झालेली सर्व आक्रमणे गांधार भूमीतूनच झाली. कारण पश्चिम आणि उत्तरेकडून भारतात प्रवेश करण्यासाठी दोनच जमिनी वाटा होत्या. एक खैबर आणि दुसरी बोलन खिंड. समुद्री मार्ग खुले झाले, भूराजकीय गणिते बदलली तरी या भागाचं महत्त्व काही कमी झालं नाही. 

भारत आणि अफगाणिस्तान ही पूर्वापार चालत आलेली एक अतूट बंधनाची नाळ आहे. तीच डॉ. प्रमोद पाठक यांनी त्यांच्या 'द अफगाण कनेक्शन' या पुस्तकात उलगडली आहे.  

भारतीय उपखंड आणि त्याच्या लगत असणाऱ्या भूभागात जगातल्या प्राचीन संस्कृतींपैकी एक उदयाला आली, वाढली. काही बदल होत तीच संस्कृती आजही या उपखंडात टिकून आहे. मोठे बदल झाले ते सीमावर्ती भागात म्हणजेच, वायव्य भागात. इस्लामिक आक्रमणानंतर झालेले बदल वरवरचे आहेत हे बलोच स्वातंत्र्यकांक्षीच्या, "आम्ही पाकिस्तानी गेल्या ५०-६० वर्षांपासून आहोत, मुस्लिम १४०० वर्षांपासून पण गेल्या हजारो वर्षांपासून आम्ही बलोच आहोत" वाक्यातून स्पष्ट होते. 

द अफगाण कनेक्शन या पुस्तकात डॉ. पाठक अफगाणिस्तानचा प्रागैतिहासिक काळापासून धांडोळा घेण्यास सुरवात करतात. त्या काळाचे काही पुरावे त्या भूमीत आहेत त्यांचे यथायोग्य दाखले देत एका महत्त्वपूर्ण घटनेकडे येतात. 

सिंधू संस्कृती म्हणून जी ओळखल्या जात होती, ती आता अधिक अभ्यासांती सिंधू-सरस्वती संस्कृती म्हणून ओळखली जात आहे. अधिकाधिक अभ्यासातून हेदेखील स्पष्ट होत आहे की त्या संस्कृतीचा काळ आजवर समजत होतो त्यापेक्षा अधिकच जुना आहे. तर सिंधू-सरस्वती संस्कृतीला समांतर काही ठिकाणे, गांधार भूमीत आढळून आली आहेत. ऋग्वेदात दाशराज्ञ युद्ध ही एक फार महत्त्वपूर्ण, वैशिष्ट्यपूर्ण घटना आहे. त्या युद्धात देखील गांधार भूमीतून गेलेल्या तत्कालीन टोळ्यांचा पुरावा डॉ. मांडतात. 

वेद वाङ्मय आणि प्राचीन पर्शिअन पवित्र ग्रंथ अवेस्ता मध्ये एका सामाजिक दुभंगाचा संदर्भ आहे. सिंधू-सरस्वती संस्कृतीतील शहरे लयाला जात असताना मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले. त्यातील एक शाखा पश्चिमेकडे गेली. त्यांनी अग्निपूजेवर आधारित असा पारशी धर्म वाढवत नेला. दुसरी शाखा पूर्वेकडे येऊन गंगा खोऱ्यात विसावली आणि यज्ञ संस्कृतीवर आधारित सनातन धर्म पुढे गेला. या सर्व घटनेचा, त्याच्या शक्यतांचा, त्यांच्या आपसातील संबंधांचा यथायोग्य धांडोळा या पुस्तकात घेण्यात आला आहे. 

महाभारत, गांधार आणि भारतीय युद्ध हा भारताच्या इतिहासातील एक स्थित्यंतर घडवून आणणारा टप्पा आहे. केवळ महाकाव्यांतील लिखित पुरावेच नाही तर पुरातत्त्वीय पुरावे देखील आता समोर येत आहेत. त्यातून हा अन्योन्य संबंध अधिकाधिक ठळक होत आहे. याचाही यथायोग्य धांडोळा घेण्यात आला आहे. 

पुढे ग्रीक आक्रमण, त्यांना भारताच्या भूमीत झालेला कडवा प्रतिकार आणि मध्य आशियाच्या भूमीत स्थापन झालेली ग्रीक क्षत्रपांची राज्ये त्यातून पुढे आलेल्या अनेक परंपरा यांचा अभ्यास डॉ. पाठक यांनी मांडला आहे. उत्तरेकडून आलेली शक-कुशाणांची आक्रमणे, त्यांचा विस्तार आणि त्यासोबत घडलेली एक महत्त्वाची घटना म्हणजे अफगाण भूमीत बौद्ध मताचा प्रचार-प्रसार. 

हे बौद्ध मत एका निराळ्या, सुंदर अशा गांधार कलाशाखेला वृद्धिंगत करुन गेले. भारतीय मूर्तिशास्त्र, कलाकारी यांच्या विकासाची एक शाखा गांधारात समृद्ध झाली. या कलाकारीचे सर्वोच्च टोक म्हणता येतील अशा बामियानच्या बुद्धमूर्ती.... होत्या. 

पुढचा इस्लामिक आक्रमणे, अफगाण भूमीचे बौद्ध मतातून संपूर्ण इस्लामीकरण हा इतिहास आहे. जयपाळ आणि अनंगपालांची राजपूत हिंदू राज्ये ही या भागातील शेवटची हिंदू राज्ये. इस्लामी आक्रमकांनी केलेल्या हिंदू-बौद्धांच्या कत्तली, त्यांची गोठलेली कलेवरे यातूनच त्या पर्वतरांगेला 'हिंदुकुश' हे नाव पडले. मध्ययुगीन अफगाण भूमीचा इतिहास गुंतागुंतीचा आहे. गजनी-घोरीची आक्रमणे यापासून सुरु झालेला सिलसिला अब्दाली पाशी येऊन थांबला. तिथून पुढला ग्रेट गेमच्या वाटेने तालिबान पर्यंतचा इतिहास डॉ. पाठक यांच्या 'द अफगाण कनेक्शन' या छोटेखानी पण आशयाने भरपूर असलेल्या पुस्तकात वाचायलाच हवा. 


पूर्वप्रसिद्धी: 


Comments

Popular posts from this blog

विश्वास कसा ठेवावा?

दिल्लीतील लाल किल्ला परिसरात स्फोट झाला, १२ जण ठार आणि २१ जखमी. ही बातमी ऐकताना आपण पुन्हा एकदा हादरलो. हा हादरा यावेळी अधिक खोल होता. कारण २०११–१२ नंतर जम्मू-कश्मीरच्या संवेदनशील पट्ट्याशिवाय भारतात मोठ्या साखळी स्फोटांची मालिका जवळजवळ थांबली होती. तुरळक घटना झाल्या, पण एकूणात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. “आमचा मुलगा निष्पाप आहे.” “सरकार खोटे आरोप करते.” ही सारवासारवी दरवेळी ऐकताना मनात प्रश्न पुन्हा उभा राहतो,  विश्वास कसा ठेवावा? मणिपूरमधील हल्ल्यानंतर म्यानमार सीमापार कारवाई झाली. उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक, पुलवामा नंतर बालाकोट, पहलगाव हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ चे तांडव झाले.  पण त्यांच्यापेक्षा कितीतरी पट अधिक महत्त्वाच्या, आणि क्वचितच चर्चेत येणाऱ्या, म्हणजे गुप्तचर संस्थांच्या  शंभरपैकी नव्व्याण्णव  यशस्वी कारवाया कटांचे उधळलेले धागे, पकडले गेलेले शस्त्रसाठे, रोखले गेलेले आत्मघातकी हल्ले, आणि वेळेवर अटकसत्रात अडकवलेले दहशतवादी.  २०१५–१६ मध्ये गुजरातच्या समुद्रात पकडून बुडवलेली संशयास्पद बोट असो, कांडला बंदरावर जप्त झालेले प्रचंड अंमली प...

मऱ्हाटीची बोलू कौतुके

छायाचित्र सौजन्य: इंटरनेट  अर्थाचा अनर्थ केला की घोटाळे होतात. कसे?  एक्स (भूतपूर्व ट्विटर) वर 'जेम्स ऑफ बॉलिवूड' नावाचं एक हॅन्डल आहे. हिंदी सिनेसृष्टी, ज्याला बॉलिवूड असं म्हणतात, तिथे ४०-५० च्या काळापासून हिंदू तितुका वाईट, हिंदू चालीरीती तितुक्या वाईट, त्यांची कितीही खिल्ली उडवा पण एक प्रेमळ रहीम चाचा, माय सन वगैरे म्हणणारा पाद्री प्रेमळच असणार याची जंत्री मांडलेली असते. बहुतांश खरी असते. पण त्याच हँडलच्या निर्माते-चालक संजीव नेवर यांनी एका मुलाखतीत एका गोष्टीचा अर्थाचा अनर्थ केला आणि घोटाळा केला.  त्यांनी लता मंगेशकर यांच्या संदर्भातला एक दाखला दिला, की सुरुवातीच्या काळात दिलीप कुमार यांनी लता मंगेशकर यांना उद्देशून एक टोमणावजा वक्तव्य केले की, तुमच्या उर्दूच्या उच्चारात मराठीपणा दिसतो. तर लता मंगेशकर यांनी दीड वर्षे उर्दूची शिकवणी लावून आपले उर्दू उच्चार घोटून घेतले. इतके की कोणाला शंकाही येऊ नये.  त्यावर या नेवर यांचं म्हणणं असं की लता मंगेशकर यांना उर्दू वगैरे शिकण्याची काय गरज होती? आणि त्यांनी ठणकावून सांगण्याची गरज होती की, 'हो, आहे मी मराठी. मग माझ्या उच्...

Mestak: Decolonizing Bharat the Maratha Way

Hemadri Pandit. Decolonisation is not merely the removal of foreign political power. It is the restoration of intellectual confidence. It is the recovery of systems. It is the reclaiming of institutional memory. The Maratha Empire did not simply challenge imperial authority on the battlefield; it reconstructed the civilizational backbone of Bharat. At the heart of that reconstruction lay something deeply profound yet often overlooked: the revival of the ancient Indic tradition of accounting and state book-keeping embodied in the concept of मेस्तक (Mestak). What is Mestak? Mestak was a structured accounting manuscript tradition, a codified format for recording state revenue and expenditure. But more than that, it was a philosophy of governance. The preserved shloka states: लेखकासी हे मेस्तक। नीतिवंता नीतिशास्त्र देखा। राजकी लोकांसि विवेक। प्रकट करी।। लेखणी दिधली ज्याचे हाती। तो स्वीकारिला सरस्वती। लेखनकळा वर्षा आरती। साधली तया I आताही जे असता धरिती येणेप्रमाणे लिहिती। त्यासी पावेल सरस्व...