Skip to main content

भारतीय राष्ट्र: परंपरेच्या दृष्टीकोनातून घेतलेला वेध: विषय प्रवेश


वक्ता दशसहस्त्रेषु प्रा. राम शेवाळकर यांनी त्यांच्या योगेश्वर श्रीकृष्णावरील व्याख्यानात 'परंपरा' ही संकल्पना मांडली आहे. ती पूजा-अर्चा, व्रत-वैकल्ये, सामाजिक चालीरीती या अर्थी नाही. भारतीय राष्ट्राचा सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक गाभा या व्यापक अर्थाने ती संकल्पना त्यांनी मांडली आहे. श्रीकृष्ण उलगडण्याचा दृष्टीने त्यांनी तिचा थोडक्यात विस्तार केला आहे. तोच धागा पकडून भारतीय राष्ट्राचा परंपरेच्या दृष्टिकोनातून वेध घेण्याचा हा प्रयत्न आहे... 

भारतीय राष्ट्र.... उच्चारल्याबरोबर माझ्या तरी डोळ्यासमोर येते ते विष्णू पुराणातील भारतीय भूमीचे आणि भारतीयाचे वर्णन, 

उत्तरं यत् समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम।

वर्षं तद भारत नाम भारती यत्र संतति:।।

समुद्राच्या उत्तरेला आणि हिमाद्रीच्या दक्षिणेला असलेल्या भूमीला भारत म्हणतात आणि तिथे राहणारे ते भारतीय. 

ही झाली भौगोलिक व्याख्या. पण भारतीय राष्ट्र केवळ या भूगोलापलीकडे आहे. सिंधू-सरस्वती-वेद काळापासून चालत आलेला तो सांस्कृतिक प्रवाह आहे. 

राज्यकर्ते आले गेले. राजकीय व्यवस्था बदलत राहिल्या. बदलला नाही तो संस्कृतीचा गाभा. एकम सत विप्रा बहुधा वदन्ति हा मंत्र प्रमाण.  तो तसाच आहे. मुळं घट्ट आहेत, खोड भक्कम आहे, अनेक फांद्या फुटल्या त्या विस्तारत गेल्या आहेत. 

भारतीय सांस्कृतिक राष्ट्रवादाची भावना प्रबळ होती. ती अधिकाधिक प्रबळ राखणे आपले कर्तव्य आहे. हे म्हणत असताना, रं ना गायधनी आणि व ग राहुरकर यांच्या 'प्राचीन भारताचा सांस्कृतिक इतिहास' या पुस्तकातील ही वक्तव्ये विचारात घेतलीच पाहिजेत, 

"इतिहास चालू पिढीला मार्गदर्शन करणारा व भविष्य घडवणारा सांस्कृतिक ठेवा आहे ही भारतीयांची श्रद्धा आहे." तसेच 

"भारतीय संस्कृतीने काल हा अनादि अनंत मानला आहे. कोणत्याही घटनेचा कालनिर्णय भारतीयांना गौण वाटतो. काळाच्या पटावर मानवी कर्तृत्वाने लिहिलेले आलेख हेच लक्षणीय धन आहे." आणि, 

"व्यक्ती संस्कृती घडवत नाही, पण संस्कृती व्यक्तीचे जीवन नक्कीच घडवते" 

असा सर्व सांस्कृतिक पट लक्षात घेत मूळ विषयाकडे परत आले पाहिजे, तो परंपरेच्या दृष्टीने भारतीय राष्ट्राचा वेध. प्रा. शेवाळकर मांडतात त्या परंपरा चार, 

कोशल राज्याचे राजपुरोहित, 'योगवासिष्ठ' कर्ते ऋषी वसिष्ठ यांच्यापासून सुरु होणारी 'वसिष्ठ' परंपरा, 

ऋग्वेद द्रष्टे, प्रतिसृष्टी निर्माते, राजर्षी विश्वामित्र यांच्यापासून सुरु होणारी 'विश्वामित्र' परंपरा, 

सप्तर्षींपैकी एक, ब्रह्मा निर्मित  प्रजापतींपैकी एक अशा भृगु ऋषींच्यापासून सुरु होणारी 'भार्गव' परंपरा, आणि, 

भगवान श्रीविष्णू पासून सुरु होणारी 'नारायणीय' परंपरा.. 

काय आहेत या परंपरा? प्राचीन ते आधुनिक इतिहासात त्यांचे प्रतिबिंब कोठे आणि कसे दिसते? 

याचा वेध पुढल्या भागात... 

Stay Tuned. 

Comments

Popular posts from this blog

अथातो बिंब जिज्ञासा

अथातो ब्रह्म जिज्ञासा, असे म्हणत ऋषीमुनींनी या विश्वाचे रहस्य जाणून घेण्यासाठी गहन चर्चा केल्या. त्याचे रूपांतर वेद-उपनिषद, पुराणे यात झाले. त्यासोबतच एक प्रगल्भ समाज उभा राहिला, त्यांच्या पूजा पद्धती, उपासना पद्धती विकसित होत गेल्या. त्या क्रमाने विकसित होत निसर्ग-नैसर्गिक शक्तींची पूजा, यज्ञाद्वारे आहुती देणे ते प्रतीक निर्माण ते प्रतिमा निर्मिती इथवर पोचल्या. श्रेष्ठ मूर्तिविज्ञान साधक, संशोधक डॉ. गोरक्षनाथ तथा गो. ब. देगलूरकर, मांडतात, "ऋग्वेदात श्री विष्णूच्या संबंधी सहा ऋचा आहेत, त्या एका अर्थी विष्णूच्या 'शाब्दिक प्रतिमाच' आहेत. या शाब्दिक प्रतिमेचे प्रत्यक्ष प्रतिमेत रुपांतर करण्यासाठी पाषाण वापरले गेले. ते मग एका कुंपणाने बंदिस्त केले गेले. त्याला 'नारायण वाटक' म्हणू लागले" मूर्ती घडवणे, त्यांचे उपासना, पूजा यातील वाढते महत्त्व, त्यांचे अर्थ हा विषय गहन आहे तरीही उद्बोधक आहे. हाच देगलूरकर यांचा ध्यास आहे. तो आजवर अनेक पुस्तकांमधून समोर आला आहेच, त्यात 'अथातो बिंब जिज्ञासा' या टागोर फेलोशिप साठी लिहिलेल्या थिसीसची भर पडली आहे. तोच थिसीस मूर्ती,...

बांगलादेश राजकीय अस्थिरता; भारताला संधी

तिरुपूर: कापड उद्योग: फोटो बिजनेस स्टॅडंर्ड  बटरफ्लाय इफेक्ट... ही संकल्पना आता सर्वत्र झाली आहे. म्हणजे हजारो मैलांवर एखादी घटना घडते किंवा घडत असते आणि तिचे चांगले-वाईट परिणाम जगाच्या दुसऱ्या टोकाला दिसून येऊ शकतात. तसेच काहीसे एकोणिसाव्या शतकात भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्राच्या बाबतीत घडले.  उत्तर अमेरिका हा कापसाचा मोठा उत्पादक होता. मँचेस्टर वगैरे मधील वस्त्रोद्योगा साठी कच्चा माल मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण. कच्चा माल मिळण्याचे स्रोत खात्रीशीर आणि भारतासह सर्व वसाहती या हक्काची बाजारपेठ म्हणून उपलब्ध होत्या. हा व्यापार ब्रिटिशांसाठी लाभदायक होता. भारताकडे येणारा मार्ग 'केप ऑफ गुड होप' ला वळसा घालून येणारा, लांबचाच असला तरी लाभदायक होता. अमेरिकेच्या दक्षिणेकडील राज्यात हे कापसाचे प्रचंड उत्पादन होते आणि आफ्रिकेतून नेलेले गुलाम तिथे राबत असत. अब्राहम लिंकनच्या काळात गुलामी असावी की असू नये या प्रमुख मुद्द्यावरुन उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील राज्यात गृहयुद्ध पेटले. या युद्धात लाखांच्या घरात मनुष्यहानी झालीच पण ब्रिटिशांना मिळणारा हक्काचा कापूस पुरवठा झपाट्याने कमी झाला.  अश...

सह अस्तित्वाचे प्रश्न:

सह अस्तित्वासाठी मुस्लिम समाजाकडून हिंदूंच्या अपेक्षा  भारत हा विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक प्रवाहांचा गोपाळकाला आहे. एक चावून चोथा झालेलं वाक्य वापरायचे तर अनेक धर्म, सांस्कृतिक परंपरा इथे गुण्यागोविंदाने राहतात. खरेच राहतात? राहत असल्या असत्या तर 'सह अस्तित्वाचे प्रश्न' आपल्याला विचारावे लागले असते का?  भारत प्राचीन काळापासून कायमच सांस्कृतिक अखंडता असणारे, विविध राज्यांत, राज्यपद्धतीत नांदणारे राष्ट्र राहिले आहे. भारतीय विचारात आसेतुहिमाचल राजकीय प्रभुत्वाची, सार्वभौमत्वाची चक्रवर्ती ही संकल्पना आहे. प्राचीन काळापासून भारताने अनेक आक्रमणे झेलली. त्यातली बहुतांश पचवली. आक्रमक भारतीय विचारात, संस्कृतीत एकरूप झाले, मिसळून गेले. आक्रमकांना पचवून, त्यांना आपलंसं करुन सह अस्तित्वाचा एक आदर्श उभा करणारी ही संस्कृती मध्ययुगीन कालखंडाच्या सुरुवातीला आलेल्या, एका धार्मिक आक्रमणाने इतकी कोलमडली कशी? इतकी कोलमडली की त्यामुळे सह अस्तित्वाचे प्रश्न निर्माण होऊ लागले. त्याचे एक कारण निश्चितच भारतीय वैचारिक जगतात आलेले एक औदासिन्य, आत्ममग्नता आणि वाढती सामाजिक विषमता हे आहेच. ते नाका...