Skip to main content

राम मंदिर: राम विचार, राम विधान


उदंड जाहले पाणी 
स्नानसंध्या करावया 
जप तप अनुष्ठाने, आनंदवनभुवनी।।

बुडाली सर्वही पापे
हिंदुस्थान बळावले 
अभक्तांचा क्षयो झाला, आनंदवनभुवनी।।

साक्षेपी लेखक, विचारवंत नरहर कुरुंदकर शिवाजी महाराजांवरील व्याख्यानात म्हणतात, "उदंड जाहले पाणी स्नानसंध्या करावया, हे पाणी उदंड तेव्हाच होते जेव्हा दोन्ही तीरांवर हिंदूंचे राज्य असेल नाही तर तेच पाणी उडी मारून आत्महत्या करण्याच्या योग्य ठरते" 

आज अयोध्येत श्रीरामलला विराजमानची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीरामरायाकडे क्षमायाचना केली. आमच्या पुरुषार्थात, एकीत, क्षात्रतेजात काही कमतरता होती म्हणून हे श्रीराममंदीर होण्यास इतका विलंब झाला. पण आता श्रीराम विराजमान झाले आहेत. हा अभूतपूर्व क्षण आहे, आणि श्रीराम नक्कीच आपल्याला क्षमा करतील. 

आजचा दिवस हा शरयू-गंगा-भागीरथीचे पाणी उदंड करणारा आहे. नर्मदा, सिंधू, गौतमी, कावेरी, वाशिष्ठी, कृष्णा, ब्रह्मपुत्र, महानदीचे पाणी उदंड करणारा आहे. हा क्षण आपण सर्वानी याची देही याची डोळा अनुभवला! धन्य झालो.  

हा अभूतपूर्व क्षण अनुभवत असतानाच अनेक विचार अखंडपणे येत आहेत. काय आहे ही भारतीय संस्कृती, भारतीय परंपरा! इतके जीवघेणे आघात झाले, अजूनही होत आहेत, होत राहणार आहेत तरीही आपण टिकून कसे राहिलो? भारतात राजकीय विविधता कायमच राहिली आहे. ठिकठिकाणची पारंपरिक विविधता राहिली आहे. सामाजिक विविधता ही विषमतेच्या पातळीवरची राहिली आहे. हीच विषमता बाह्य आक्रमणांना आमंत्रण देणारी, विनाश ओढवून घेणारी ठरली आहे. तरीही टिकून राहिलो कसे? 

ही संस्कृती नित्य नूतन इति सनातन आहे. ती काळाबरोबर प्रवाही राहते. नव्या प्रवाहांनुसार बदल करते. बदल अंगिकारते. परंपरेचा गाभा तोच राखून आधुनिकतेशी सांधा जोडते...  आणि क्षात्रतेज कायम राखते!

उत्तरेत राजा दाहीर, जयपाळ, अनंगपाळ प्राणांतिक लढे देत असताना मध्य भारत निराळे मापदंड प्रस्थापित करत होता. जयपाळ-अनंगपाळ यांच्या मदतीला ललितादित्याचे साम्राज्य धावून जात होते. विविधता असली तरी एक साह्चार्याची आणि सांस्कृतिक एकतेची भावना होतीच. इस्लामी आक्रमणाच्या रेट्यापुढे भारताचे क्षात्रतेज काहीसे क्षीण झाले असे वाटेपर्यंत बाप्पा रावळ, चाहमान, चालुक्य, राष्ट्रकूट, सेन, परमार अशी शक्ती उभी राहते. उत्तरेत लढे सुरु असताना दक्षिण भारत अद्वैत, द्वैत, विशिष्टाद्वैत यांची परंपरा कायम करत होता. 

उत्तरेतले क्षात्रतेज काहीसे क्षीण झाले असे वाटत असताना त्याला क्षत्रिय आणि धार्मिक पुनरुत्थान दक्षिणेकडूनच सातत्याने मिळत गेले. यादव, कदंब, काकतीय, होयसाळ, पांड्य, चेर, पल्लव असे करत ही परंपरा विजयनगर पर्यंत चालत आली. क्षात्रतेज कायम राखत एक सातत्यपूर्ण लढा दक्षिण आणि पूर्वेच्या राज्यांनी दिला. ओडिशाचे गजपती, आसामचे आहोम यांनी जगन्नाथाच्या आशीर्वादाने आणि आसामने श्रीमंत संकरदेवांच्या धार्मिक पाठिंब्याने केले.  

विजयनगरच्या पतनानांतर एक काळरात्र येऊ पाहत होती, पण एक शतसूर्य सह्याद्रीच्या भूमीत उगवला ज्याने भारतभूमी उषःकालाकडे नेली. शिवाजीराजा छत्रपती होणे ही भारतभूमीतली गंगा-सिंधू-सरस्वती मुक्त करणारी घोषणा होती. त्याचीच प्रेरणा सातत्याने तेवती आहे, जी राम मंदिर प्राण प्रतिष्ठेतून काही अंशी पूर्ण होत, एक पायरी चढली आहे. 

राम मंदिर ही एका आधुनिक क्षात्रतेजाची प्राण प्रतिष्ठा आहे. ती अमृत काळाची प्रेरणा आहे. ती राम नीती, राम नेती, राम विचार, राम विधानाची प्रेरणा आहे. ती वृद्धिंगत करत नेली तरच 

स्वर्गीची लोटली जेथे 
रामगंगा महानदी 
तीर्थासी तुळणा नाही, आनंदवनभुवनी।

जय श्री राम!




Comments

Popular posts from this blog

डॉ. आंबेडकरांचे आर्थिक चिंतन आणि वर्तमानातील प्रासंगिकता

एक प्रसिद्ध वचन आहे, "some are born great, some achieve greatness and some are those the greatness is thrust on them.." म्हणजे, काही जन्मतःच महान असतात. तर काही आपल्या कार्यातून, कृतीतून महत्पदाला पोचतात. तर काहींवर महानता लादली, थोपली गेलेली असते. प्रस्तुत विषयाला अनुसरून या वचनातला तिसरा भाग अप्रस्तुत आहे. माणूस जन्मतःच महान असतो का? ती जन्मजात महानता त्या माणसाच्या पुढील आयुष्यातील महत्कार्यामुळे सिद्ध होते. थोर, साक्षेपी विचारवंत कुरुंदकर मांडतात त्याप्रमाणे शिवाजी महाराज हे जन्मतःच महान होते असे आपण म्हणतो कारण महाराजांचे संपूर्ण महत्कार्य आपल्या समोर आहे म्हणून. याच न्यायाने भारतीय सामाजिक, राजकीय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक क्षेत्रात आपल्या कृतीतून, कार्यातून महत्पदाला पोचलेले महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्या महामानवाचे महत्कार्य आपल्या समोर आहे, म्हणून आपण अभिमानाने म्हणून शकतो की ते जन्मताच महान होते.  भारतीय समाजमन माणसांना चौकटीत बसवण्यास उत्सुक असते. एकाच झापडबंद दृष्टीने व्यक्ती आणि कार्याकडे बघण्याचा प्रयत्न करते. पण याच भारताची दुसरी ...

मऱ्हाटीची बोलू कौतुके

छायाचित्र सौजन्य: इंटरनेट  अर्थाचा अनर्थ केला की घोटाळे होतात. कसे?  एक्स (भूतपूर्व ट्विटर) वर 'जेम्स ऑफ बॉलिवूड' नावाचं एक हॅन्डल आहे. हिंदी सिनेसृष्टी, ज्याला बॉलिवूड असं म्हणतात, तिथे ४०-५० च्या काळापासून हिंदू तितुका वाईट, हिंदू चालीरीती तितुक्या वाईट, त्यांची कितीही खिल्ली उडवा पण एक प्रेमळ रहीम चाचा, माय सन वगैरे म्हणणारा पाद्री प्रेमळच असणार याची जंत्री मांडलेली असते. बहुतांश खरी असते. पण त्याच हँडलच्या निर्माते-चालक संजीव नेवर यांनी एका मुलाखतीत एका गोष्टीचा अर्थाचा अनर्थ केला आणि घोटाळा केला.  त्यांनी लता मंगेशकर यांच्या संदर्भातला एक दाखला दिला, की सुरुवातीच्या काळात दिलीप कुमार यांनी लता मंगेशकर यांना उद्देशून एक टोमणावजा वक्तव्य केले की, तुमच्या उर्दूच्या उच्चारात मराठीपणा दिसतो. तर लता मंगेशकर यांनी दीड वर्षे उर्दूची शिकवणी लावून आपले उर्दू उच्चार घोटून घेतले. इतके की कोणाला शंकाही येऊ नये.  त्यावर या नेवर यांचं म्हणणं असं की लता मंगेशकर यांना उर्दू वगैरे शिकण्याची काय गरज होती? आणि त्यांनी ठणकावून सांगण्याची गरज होती की, 'हो, आहे मी मराठी. मग माझ्या उच्...

विश्वास कसा ठेवावा?

दिल्लीतील लाल किल्ला परिसरात स्फोट झाला, १२ जण ठार आणि २१ जखमी. ही बातमी ऐकताना आपण पुन्हा एकदा हादरलो. हा हादरा यावेळी अधिक खोल होता. कारण २०११–१२ नंतर जम्मू-कश्मीरच्या संवेदनशील पट्ट्याशिवाय भारतात मोठ्या साखळी स्फोटांची मालिका जवळजवळ थांबली होती. तुरळक घटना झाल्या, पण एकूणात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. “आमचा मुलगा निष्पाप आहे.” “सरकार खोटे आरोप करते.” ही सारवासारवी दरवेळी ऐकताना मनात प्रश्न पुन्हा उभा राहतो,  विश्वास कसा ठेवावा? मणिपूरमधील हल्ल्यानंतर म्यानमार सीमापार कारवाई झाली. उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक, पुलवामा नंतर बालाकोट, पहलगाव हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ चे तांडव झाले.  पण त्यांच्यापेक्षा कितीतरी पट अधिक महत्त्वाच्या, आणि क्वचितच चर्चेत येणाऱ्या, म्हणजे गुप्तचर संस्थांच्या  शंभरपैकी नव्व्याण्णव  यशस्वी कारवाया कटांचे उधळलेले धागे, पकडले गेलेले शस्त्रसाठे, रोखले गेलेले आत्मघातकी हल्ले, आणि वेळेवर अटकसत्रात अडकवलेले दहशतवादी.  २०१५–१६ मध्ये गुजरातच्या समुद्रात पकडून बुडवलेली संशयास्पद बोट असो, कांडला बंदरावर जप्त झालेले प्रचंड अंमली प...